शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भारताच्या शक्तिशाली उपग्रहाला इस्रोने हिंदी महासागरात दिली जलसमाधी, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:21 IST

ISRO Cartosat-2 Satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-२ या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-२ या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या सॅटेलाइटने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर हिंदी महासागरात कोसळून नष्ट झाला. याच सॅटेलाइटची पुढची पिढी असलेल्या कार्टोसॅट-२सी ने या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये म्हणून या सॅटेलाईटला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात आणण्यात आले. कार्टोसॅट-२ या सॅटेलाइटचं प्रक्षेपण १० जानेवारी २००७ रोजी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. देशाची हाय रेझोल्युशन छायाचित्रे घेता यावीत. त्या माध्यमातून रस्ते बनवता यावेत. नकाशे तयार करता यावेत, या उद्देशाने हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला होता. 

या उपग्रहाचं आयुर्मान ५ वर्षांचं होतं. मात्र तो १२ वर्षे सक्रिय राहिला.अखेरीस २०१९ मध्ये या उपग्रहाला डिअॅक्टिव्हेट करण्यात आले होते. हा हाय रेझोल्युशन इमेजिंग सॅटेलाइट मालिकेतील दुसऱ्या पिढीतील उपग्रह होता. ६८० किलोग्रॅम वजनाचा हा सॅटेलाइट सन-सिंनक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये पृथ्वीपासून ६३५ किमी उंचीवर तैनात करण्यात आला होता. २०१९ पर्यंत या उपग्रहाने देशाची उत्तमोत्तम छायाचित्रे टिपली होती. कार्टोसॅट-२ हा ३० वर्षांनी नैसर्गिकरीत्या पृथ्वीवर कोसळेल, असे सांगण्यात येत होते.

इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क सेंटरच्या सिस्टिम फॉर सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्सच्या टीमने कार्टोसॅट-२ ला पृथ्वीवर समुद्रापर्यंत यशस्वीरीत्या आणले. १४ फेब्रुवारी रोजी हा उपग्रह पृथ्वीपासून १३० किमी अंतरावर असताना इलेक्ट्रिकल पॅसिव्हेशन यशस्वीरीत्या करण्यात आले होते.  त्यानंतर कार्टोसॅट-२ हळुहळू पृथ्वीच्या दिशेने आला. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.४५ दरम्यान,  हा उपग्रह हिंदी महासागरात यशस्वीरीत्या पाडण्यात आला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या उपग्रहाचे बहुतांश भाग जळून खाक झाले. कार्टोसॅट-२ ला यशस्वीपणे जलसमाधी देत भारताने अंतराळात होणाऱ्या अनेक दुर्घटनांशी शक्यता संपुष्टात आणली आहे.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत