शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या शक्तिशाली उपग्रहाला इस्रोने हिंदी महासागरात दिली जलसमाधी, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 16:21 IST

ISRO Cartosat-2 Satellite: भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-२ या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) शक्तिशाली अशा कार्टोसॅट-२ या उपग्रहाला हिंदी महासागरात जलसमाधी दिली आहे. कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी या सॅटेलाइटने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर हिंदी महासागरात कोसळून नष्ट झाला. याच सॅटेलाइटची पुढची पिढी असलेल्या कार्टोसॅट-२सी ने या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होऊ नये म्हणून या सॅटेलाईटला नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात आणण्यात आले. कार्टोसॅट-२ या सॅटेलाइटचं प्रक्षेपण १० जानेवारी २००७ रोजी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. देशाची हाय रेझोल्युशन छायाचित्रे घेता यावीत. त्या माध्यमातून रस्ते बनवता यावेत. नकाशे तयार करता यावेत, या उद्देशाने हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला होता. 

या उपग्रहाचं आयुर्मान ५ वर्षांचं होतं. मात्र तो १२ वर्षे सक्रिय राहिला.अखेरीस २०१९ मध्ये या उपग्रहाला डिअॅक्टिव्हेट करण्यात आले होते. हा हाय रेझोल्युशन इमेजिंग सॅटेलाइट मालिकेतील दुसऱ्या पिढीतील उपग्रह होता. ६८० किलोग्रॅम वजनाचा हा सॅटेलाइट सन-सिंनक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये पृथ्वीपासून ६३५ किमी उंचीवर तैनात करण्यात आला होता. २०१९ पर्यंत या उपग्रहाने देशाची उत्तमोत्तम छायाचित्रे टिपली होती. कार्टोसॅट-२ हा ३० वर्षांनी नैसर्गिकरीत्या पृथ्वीवर कोसळेल, असे सांगण्यात येत होते.

इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क सेंटरच्या सिस्टिम फॉर सेफ अँड सस्टेनेबल स्पेस ऑपरेशन्सच्या टीमने कार्टोसॅट-२ ला पृथ्वीवर समुद्रापर्यंत यशस्वीरीत्या आणले. १४ फेब्रुवारी रोजी हा उपग्रह पृथ्वीपासून १३० किमी अंतरावर असताना इलेक्ट्रिकल पॅसिव्हेशन यशस्वीरीत्या करण्यात आले होते.  त्यानंतर कार्टोसॅट-२ हळुहळू पृथ्वीच्या दिशेने आला. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.४५ दरम्यान,  हा उपग्रह हिंदी महासागरात यशस्वीरीत्या पाडण्यात आला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच या उपग्रहाचे बहुतांश भाग जळून खाक झाले. कार्टोसॅट-२ ला यशस्वीपणे जलसमाधी देत भारताने अंतराळात होणाऱ्या अनेक दुर्घटनांशी शक्यता संपुष्टात आणली आहे.  

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत