शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Israel-Hamas War : भारताचे 'ऑपरेशन अजय', इस्रायलहून दुसरे विमान २३५ भारतीयांना घेऊन दिल्लीला पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 08:17 IST

ऑपरेशन अजयद्वारे इस्रायलहून २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान दिल्लीला पोहोचले आहे.

ऑपरेशन अजय अंतर्गत, इस्रायलहून २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. इस्रायलमधून येणाऱ्या भारतीय नागरिकांचे स्वागत करण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह विमानतळावर उपस्थित होते. २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान इस्रायलच्या तेल अवीव येथून निघाले. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आधी गाझा, नंतर लेबनॉन आणि आता सीरियात बॉम्बफेक; इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. 

भारत सरकारने इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या १८ हजार भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या अंतर्गत पहिले विशेष विमान गुरुवारी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २३० प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे. हे विमान शुक्रवारी सकाळी भारतात पोहचेल. या विमान प्रवासासाठी कोणतेही प्रवास शुल्क आकारण्यात येणार नाही. केंद्र सरकार हा सर्व खर्च उचलणार आहे.

तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने युद्धादरम्यान भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते भारतीय कंपन्यांसोबत ऑनलाइन बैठका घेत आहेत, ई-मेलद्वारे भारतातील विमानांची माहिती पाठवत आहेत, भारतीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन देत आहेत आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 

येथे भारतीय परिचारिकांची संख्या सर्वाधिक आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात आले. इस्रायलने हमासपाठोपाठ सीरियावरही हल्ला केल्याने युद्धाचा भडका आणखी वाढण्याची भीती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळांच्या रनवेचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका का केला याबाबत इस्रायलने माहिती दिलेली नाही.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारत