शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

इस्लामचा स्वीकार हीच खरी ‘घर वापसी’!

By admin | Updated: January 6, 2015 02:39 IST

इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ आहे, असे वादग्रस्त विधान करून मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

आगीत तेल : एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींचे वादग्रस्त वक्तव्यहैदराबाद : इस्लाम हेच सर्व धर्मांचे मूळ आहे आणि म्हणूनच अन्य धर्मांच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ आहे, असे वादग्रस्त विधान करून मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मांतरावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादाच्या आगीत आणखी तेल ओतले आहे.‘ईद-ए-मिलाद’च्या पूर्वसंध्येस शनिवारी रात्री येथील ‘दारउस्सलाम’ या पक्ष मुख्यालयाबाहेर हजारो उपस्थितांना संबोधित करताना, संघ परिवाराने हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाच्या संदर्भात, ओवैसी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, प्रत्येक माणूस मुस्लिम म्हणूनच जन्माला येत असतो; पण त्याचे आई-वडील त्याचे धर्मांतर करतात. त्यामुळे असे धर्मांतर झालेले परधर्मीय जेव्हा इस्लाम ‘कुबूल’ करतील तेव्हाच खरी ‘घर वापसी’ होईल.इतर सर्व धर्मांच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार करावा, पण त्यासाठी आमची सक्ती नाही, असे सांगताना ते म्हणाले की, आम्ही (इस्लाम) तुम्हाला पैसे देऊ शकत नाही; पण इहलोकीच्या आणि परलोकीच्या सुखाची हमी मात्र नक्की देऊ शकतो.संपूर्ण मानव वंशाचा जनक असलेला ‘आदम’ (अ‍ॅडम) (स्वर्गातून) पृथ्वीवर अवतरला तेव्हा सर्वप्रथम तो भारतात उतरला. त्यामुळे भारत ही आपली पितृभूमी आहे, असा दावाही ओवैसी यांनी केला.संघ परिवाराच्या ‘घर वापसी’वर मूग गिळून गप्प बसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीका केली. निरपराध्यांची हत्या करणारे पाकिस्तानवासी दहशतवादी झकी-उर-रहमान लख्वी आणि हफीज सईद हे भारताचे शत्रू आहेत व त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी, असे सांगताना ओवैसी म्हणाले की, एमआयएमचे भारतीय जनता पक्षाशी राजकीय मतभेद असले तरी देशाच्या शत्रूंवर कारवाईच्या बाबतीत आमचा भाजपाला पाठिंबा आहे व ही भूमिका आपण संसदेतही स्पष्टपणे मांडली आहे. (वृत्तसंस्था)