शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इशात हुसैन यांची TCSच्या अध्यक्षपदी नियुक्ती

By admin | Updated: November 10, 2016 11:59 IST

टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांचे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवले असून त्याजागी इशात हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - टाटा समूहाने सायरस मिस्त्री यांचे टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवले असून त्याजागी इशात हुसैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून 'सायरस मिस्त्री' यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्यानंतर आता मिस्त्री यांना टीसीएसच्या अध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले आहे. टाटा समूहातीलच इशात हुसैन यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले असून हुसैन लगेचच सूत्रे हातात घेणार आहेत. 
मोठ्या उमेदीनं ज्याच्या हाती देशातील अवाढव्य अन् शिस्तप्रिय उद्योगसमूहाची कमान काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती, त्याच मिस्त्री यांना २५ ऑक्टोबर रोजी समूहानेच अचानक ‘टाटा’ केला. 
(सायरस मिस्त्रींना 'टाटा')
 
मिस्त्री यांचा वारसदार निवडण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये स्वत: रतन टाटा, टीव्हीएस उद्योग समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजदूत रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. भट्टाचार्य वगळता उरलेले सर्व जण टाटा सन्सच्या संचालक मंडळावर आहेत. आगामी चार महिन्यांत ही समिती नव्या चेअरमनचा शोध घेईल, असे सांगण्यात आले होते. 
 
कोण आहेत इशात हुसैन?
 
१ जुलै १९९९ साली हुसैन टाटा सन्सच्या बोर्डावर कार्यकारी संचालक ( एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) म्हणून रुजू झाले होते. तर २८ जुलै २००पासून ते  आत्तापर्यंत हुसैन यांनी वित्त संचालक म्हणूनही काम पाहिले. 
टाटा सन्स जॉईन करण्यापूर्वी त्यांनी टाटा स्टील कंपनीत सुमारे १० वर्ष वित्त - वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदाची धुरा सांभाळली. तसेच टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस , व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरही ते कार्यरत होते. 
 
कोण होते सायरस मिस्त्री ?
४ जुलै १९६८ साली जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले. पण, टाटा समूहाला पुढे नेण्यात ते कमी पडले, अशी चर्चा होती. नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती. 2006 मध्ये त्यांनी टाटाच्या संचालक मंडळात प्रवेश मिळविला होता. मिस्त्री यांना टाटामधील सर्वाधिक समभाग असलेल्या शापूरजी पालनजीचे प्रतिनिधी म्हणून चेअरमन करण्यात आले होते.
 
 का झाली मिस्त्रींची गच्छंती ?
टाटा स्टीलचा ब्रिटनमधील व्यवसाय विकण्याचा सर्वांत कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागला. टाटा डोकोमो फुटल्यानंतर जपानच्या डोकोमोसोबत कंपनीचा न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णयही असाच कठीण होता. 
टाटाच्या अंतर्गत नियतकालिकात अलीकडेच त्यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. योग्य कारणांसाठी कठोर निर्णय घ्यायला कंपनीने घाबरायला नको, असे त्यांनी या मुलाखतीत म्हटले होते.
त्यांच्या या विचारांना कंपनीच्या अडचणीतील काही व्यावसाय शाखांतून प्रखर विरोध झाला होता. त्यांच्या कार्यकाळात कंपनी पुढे जाण्याऐवजी मागे गेली, असा ठपका त्यांच्यावर आला होता.
2015-16 या आर्थिक वर्षातील टाटा सन्सचे उत्पन्न १०८ बिलियन डॉलरवरून घसरून १०३ बिलियन डॉलर एवढे झाले आहे.
2016 मध्ये टाटा सन्सवरील कर्जाचा बोजा २३.४ बिलियन डॉलरवरून वाढून २४.५ बिलियन डॉलर एवढा झाला आहे.
विविध उद्योग क्षेत्रांतील १००हून अधिक कंपन्यांच्या टाटा उद्योगसमूहाची धारक कंपनी म्हणून टाटा सन्स काम पाहते.
टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे सायरस मिस्त्री सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते.
1932 मध्ये नवरोजी सकलतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती. टाटा समूहामध्ये सर्वांत मोठा (१८.५%) भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अ‍ॅण्ड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६पासून संचालक आहेत.