शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आयर्न लेडी इरोम शर्मिला अडकल्या विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 17:52 IST

जर निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरॉम शर्मिला यांनी सांगितलं होतं

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून आपला जोडीदार असलेल्या डेस्मंड कुटिन्हो सोबत इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकल्या आहेतनिवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरोम शर्मिला यांनी सांगितलं होतं4 नोव्हेंबर 2000 रोजी इरोम शर्मिला यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती 9 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं

कोडैकनाल, दि. 17 - मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला अखेर विवाहबंधनात अडकल्या आहेत. अनेक वर्षांपासून आपला जोडीदार असलेल्या डेस्मंड कुटिन्हो सोबत त्यांनी लग्न केलं. डेसमंड हे ब्रिटीश नागरिक आहेत. तामिळनाडूमधील कोडैकनाल येथे उपनिबंधक कार्यालयात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. उपनिबंधक राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. अत्यंत साध्य पद्धतीने पार पडलेल्या या लग्नात दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. 

इरोम शर्मिला यांनी तमिळनाडूतील कोडैकनाल येथील विवाह उपनिबंधकांकडे लग्नासाठी बुधवारी अर्ज केला होता. यावेळी डेस्मंडदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. या दोघांनी हिंदू विवाह कायद्याअंतर्गत विवाह करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हिंदू विवाह कायद्याअंतर्गत आंतरधर्मीय लग्नाला परवानगी देता येत नाही. त्यामुळे या दोघांना विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्नाची नोटीस देऊन ३० दिवसांनंतर लग्न करण्यास सांगण्यात आले होते. 12 जुलै रोजी त्यांनी हा अर्ज केला होता. 

आणखी वाचानिवडणुकीत पराभव झाला तरच लग्न करणार - इरॉम शर्मिलाअखेर आज 16 वर्षांनी इरॉम शर्मिलांचे उपोषण संपणार

इरोम शर्मिला यांनी १६ वर्षापासून सुरु असलेले बेमुदत उपोषण सोडताना आपली मणिपूर विधानसभा निवडणूक लढवण्याची आणि लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण जर निवडणुकीत जनतेने नाकारलं तरच आपण लग्न करणार असल्याचं इरोम शर्मिला यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इरोम शर्मिला यांनी लग्न केलं आहे.  

स्थानिक कार्यकर्ता व्ही महेंद्रन यांनी या लग्नाला विरोध केला होता. जर हे दांपत्य परिसरात राहिलं, तर आदिवासांना कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सामोरं जावं लागू शकतं असा दावा त्यांनी केला होता. मात्र उपनिबंधकांनी त्यांचा विरोध फेटाळून लावत लग्नाला परवानगी दिली. परिसरातील काही आदिवासी संघटनांनी या लग्नाला पाठिंबा दर्शवला आहे. 

4 नोव्हेंबर 2000 रोजी इरोम शर्मिला यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. इम्फाळ विमानतळाजवळच्या बसस्टॉपवर सुरक्षा दलाकडून १० जणांची हत्या झाल्यानंतर  एएफएसपीए कायदा रद्द करण्यासाठी इरोम शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या इरोम शर्मिला यांनी 9 ऑगस्ट 2016 रोजी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. आपल्याला मुख्यमंत्री होऊन एएफएसपीए कायदा रद्द करायचा असल्याचं त्यांनी उपोषण सोडताना सांगितलं होतं. मात्र निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. 

इरोम शर्मिला यांनी पीपल रिसर्जन्स अ‍ॅण्ड जस्टीस पार्टी (पीआरजेए) स्थापन करून राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली होती. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या विरोधात त्या थॉबोल मतदारसंघातून उभ्या होत्या. परंतु त्यांना अवघी ९० मते मिळाली. १५ हजार मतांनी इबोबी विजयी झाले. त्यांच्या मतदारसंघात नोटाला यापेक्षा अधिक मते (१४३) मिळाली होती.