शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विमानाप्रमाणे ट्रेनमध्ये जेवणासाठी मोजावे लागणार पैसे, प्रवासादरम्यान या गोष्टी करणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 11:31 IST

थर्ड एसीत ५२, सेकंडमध्ये ४८ प्रवासी असतील. आरोग्य सेतू अॅप आवश्यक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल.

५१ दिवसांनंतर प्रवासी रेल्वे धावण्यासाठी सज्ज आहेत.  १२ मेपासून विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना एअरलाइन्ससारखे जेवण मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने त्यांची नियमावली तयार केली आहे. कोरोना विषाणूचा धोका उद्भवू नये म्हणून रेल्वेने प्रवाशांना घरातून अन्न आणि पाणी आणण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये काहीतरी वेगळे खायचे असेल तर त्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. विमानात ज्याप्रकारे खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात अगदी त्याचप्रकारे ट्रेनमध्येही खाण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

विशेष ट्रेनमधील प्रवासादरम्यान आयआरसीटीसीच्या वतीने ई-कॅटरिंगद्वारे जेवण दिले जाईल. त्याचे शुल्क प्रवाशाच्या तिकिटामध्ये जोडले जाणार नसून स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. प्रवाशांना पाण्याची बाटलीसुद्धा स्वखर्चानेच घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारची सोयीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेवर अवलंबून राहू नये. त्यासाठी  "प्रवाशांना स्वत:च्या चादरी, खाण्याचे पदार्थ आणि पाण्याच्या बॉटल आणणे गरजेचे असणार आहे. भारतीय रेल्वे कोणत्याही प्रकारची जबाबदारी उचलणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

रेल्वे सुटण्याच्या दीड तास आधी स्टेशनवर यावे लागेल. थर्मल स्क्रीनिंगनंतर लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच पाठवले जाईल. रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश मिळेल. स्टेशन आणि रेल्वेत मास्क अनिवार्य राहील. थर्ड एसीत ५२, सेकंडमध्ये ४८ प्रवासी असतील. आरोग्य सेतू अॅप आवश्यक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल.

रेल्वेने प्रत्येक डब्यात स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. तसेच ट्रेनमध्ये प्रवेश आणि उतरताना प्रवाशांना हात स्वच्छ करणे बंधनकारक आहे. त्यासाठी वेळोवेळी सॅनिटाईज करण्याचे नियम आहे. आजपासून 12 मे रोजी विशेष गाड्या रुळावर धावण्यास सुरू होणार आहेत. रेल्वेनं निवडलेल्या मार्गांवर रेल्वेच्या 15 गाड्या धावण्यासाठी सज्ज आहेत. या गाड्यांमध्ये फक्त एसी कोच असतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या