शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 06:42 IST

आधी तपासणी, मगच केले जाहीर : चंद्राबाबू नायडू

अमरावती : देशभरात विविध स्तरातून मंदिरे आणि प्रसादांचे पावित्र्य संरक्षित करण्याची मागणी होत असताना तिरुमला तिरुपति देवस्थानममधील लाडू भेसळप्रकरणाच्या चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. पोलीस महानिरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश असेल, असे नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लाडू प्रकरणी खोटे पसरविल्याबद्दल नायडू यांना समज देण्याची मागणी केली. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे काळजीवाहक तिरुमला तिरूपती देवस्थानम् (टीटीडी) येथे तूप स्वीकारण्याच्या प्रक्रियेचे विवरण या आठ पानी पत्रात रेड्डी यांनी दिले.

देश आपल्याकडे पाहत आहे : जगनमोहन

"अशा निर्णायक क्षणी सर्व देश आपल्याकडे पाहत आहे. खोटे पसरविल्याबद्दल नायडू यांना कठोरपणे समज देणे, तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर येणेही गरजेचे आहे. त्यामुळे टीटीडीच्या पावित्र्यावर पुन्हा श्रद्धा बसू शकेल. 

आरोप झालेले तूप वेळीच नाकारण्यात आले आणि टीटीडीच्या परिसरात येऊच देण्यात आले नाही. असे असले तरी नायडू यांनी वाईट हेतूने हा प्रश्न पक्षाच्या १८ सप्टेंबरच्या बैठकीत उपस्थित केला," असे रेड्डी पत्रात म्हणाले.

तूप खरेदी प्रक्रियेत बरेच बदल : नायडू तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाडू आणि तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठिवले. सर्व पातळ्यांवरुन अहवाल आल्यानंतरच जाहीर केले, असे चंद्राबाबू नायडू म्हणाले. हा वाद मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी सुरू झाला होता. गेल्या सरकारने तूप खरेदी प्रक्रियेत बरेच बदल केल्याचेही नायडू म्हणाले. 

तुपावर जीपीएसची नजर : तिरुपति मंदिरात आता लाडू बनविण्यासाठी कर्नाटक दूध महासंघाच्या 'नंदिनी' या तुपाचा वापर केला जात आहे. ३५० टन तुपाचा पुरवठा करणाऱ्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावली आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू