शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 06:22 IST

२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.

नवी दिल्ली : पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे. या तपासात एनआयएला पोलीस, लष्कर, गुप्तहेर यंत्रणा मदत करतील.

२,५०० जवानांना घेऊन ७८ लष्करी वाहनांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला १४ फेब्रुवारी रोजी चाललेला असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अवंतीपोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. एनआयएने या प्रकरणी पुन्हा गुन्हा नोंदविला आहे. ३५० किलो आरडीएक्स भरलेली मारुती इको व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या वाहनावर जिथे धडकविण्यात आली, त्या ठिकाणाहून स्फोटकांचे नमुने एनआयएने याआधीच गोळा केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अकरा ते बारा संशयितांची या यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यांना सडेतोड उत्तर द्या, असा सूर देशभरात उमटत आहे. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडण्याचे कार्य सुरू झाले. देशवासीयांप्रमाणे सेलेब्रिटीनींही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा