शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर - राष्ट्रपती

By admin | Updated: January 31, 2017 14:09 IST

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ससदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले. ' हे अधिवेशन ऐतिहासिक' असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारने राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला. गरीब, दलित, शोषित, शेतकरी आणि श्रमिक वर्ग सरकारच्या  धोरणात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. या भाषणात त्यांनी नोटांबदी व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. सतत होणा-या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख प्रत्युत्तर ठरेल असे त्यांनी नमूद केले. तर काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.  दरम्यान आज आर्थिक सर्वेक्षणही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- हे ऐतिहासिक अधिवेशन आहे.
 
- 'सबका साथ, सबका विकास', हेच आमच्या सरकारचं ध्येय.
 
- आत्तापर्यंत १.२ कोटींहून अधिक ग्राहकांनी एलपीजीची सबसिडी सोडली.
 
- गरीबांचे जीवनमान सुधारावे यासाठी आमच्या सरकारने अनेक प्रयत्न केले असून अनेक नव्या योजना आणल्या आहेत.
 
- जनशक्तीमुळे स्वच्छ भारत अभियानाचे जन-आंदोलनात रुपांतर झाले.
 
- २६ कोटी जनधन खाती उघडली गेली.
 
-  काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी सरकारला साथ दिली.
 
- विविध सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत १३ कोटी गरीबांना सामावण्यात आले.
 
-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशात घर नसलेल्या प्रत्येक गरीबाला हक्काचे घर देण्याचा सरकारचा निर्धार.
 
- पी व्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांनी भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले.
 
- दिनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत तब्बल १६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले.
 
- देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्यास केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
 
-  आगरतळा-त्रिपुरा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज मार्गांना जोडणार.
 
-  सहा लाख दिव्यांगांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
 
- वन रँक वन पेन्शनचा प्रश्न केंद्र सरकारने निकाली काढला.
 
- आमच्या लष्कराचा आम्हाला अभिमान वाटतो.
 
-  स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून सरकार अडीच लाख एससी, एसटी आणि महिला उद्योजकांना मदत करणार.
 
- काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतला.
 
- भारतनेट उपक्रमाअंतर्गत देशातील ७५ हजार ७०० ग्रामपंचायतीना ऑप्टीकल फायबर केबलशी जोडणार.
 
- सातवा वेतन आयोग लागू झाल्याने ५० लाख कर्मचारी आणि ३५ लाख निवृत्त कर्मचा-यांना झाला फायदा .