शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

इंटरनेटही कॉर्पोरेटच्या हाती देण्याचा डाव

By admin | Updated: April 23, 2015 02:08 IST

सरकारने इंटरनेट अवकाश (स्पेस) काही बड्या कॉर्पोरेटकडे सोपविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा

नवी दिल्ली : सरकारने इंटरनेट अवकाश (स्पेस) काही बड्या कॉर्पोरेटकडे सोपविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. सोमवारी भूसंपादन विधेयकावरून सरकारला धारेवर धरल्यानंतर त्यांनी बुधवारी तोच आवेश दाखवत सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा कायम ठेवला. इंटरनेट तटस्थता (नेट न्यूट्रॅलिटी) सुनिश्चित करण्यासाठी कायदा बदलण्याची मागणीही त्यांनी केली.‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत इंटरनेट सर्वांचे आणि सर्वांसाठी असावे, हे सुनिश्चित केले आहे. मोदी सरकार कोणत्याही कॉर्पोरेटच्या दबावाखाली आलेले नाही आणि येणारही नाही, असे सांगत दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्व आरोप खोडून काढले. लोकसभेत शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की, इंटरनेट तटस्थता हा मोठा विषय असून प्रत्येक युवकाला असलेला इंटरनेटचा अधिकार सुनिश्चित केला जावा. सरकारला इंटरनेटही उद्योगपतींना वाटायचे आहे. लाखो युवक इंटरनेट तटस्थतेच्या अधिकारासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कायद्यात सुधारणा घडवून नवा कायदा आणला जावा. केंद्रात संपुआचे सरकार असताना २०१२ मध्ये कोणाकोणाचे टिष्ट्वटर हँडल रोखण्यात आले ही बाब सर्वांना माहीत आहे. २ जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून १.१० लाख कोटी सरकारला मिळाले आहेत. यापूर्वी काय स्थिती होती ते सर्वांसमोर आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)