शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

इंटरनेटही कॉर्पोरेटच्या हाती देण्याचा डाव

By admin | Updated: April 23, 2015 02:08 IST

सरकारने इंटरनेट अवकाश (स्पेस) काही बड्या कॉर्पोरेटकडे सोपविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा

नवी दिल्ली : सरकारने इंटरनेट अवकाश (स्पेस) काही बड्या कॉर्पोरेटकडे सोपविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. सोमवारी भूसंपादन विधेयकावरून सरकारला धारेवर धरल्यानंतर त्यांनी बुधवारी तोच आवेश दाखवत सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा कायम ठेवला. इंटरनेट तटस्थता (नेट न्यूट्रॅलिटी) सुनिश्चित करण्यासाठी कायदा बदलण्याची मागणीही त्यांनी केली.‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत इंटरनेट सर्वांचे आणि सर्वांसाठी असावे, हे सुनिश्चित केले आहे. मोदी सरकार कोणत्याही कॉर्पोरेटच्या दबावाखाली आलेले नाही आणि येणारही नाही, असे सांगत दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्व आरोप खोडून काढले. लोकसभेत शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले की, इंटरनेट तटस्थता हा मोठा विषय असून प्रत्येक युवकाला असलेला इंटरनेटचा अधिकार सुनिश्चित केला जावा. सरकारला इंटरनेटही उद्योगपतींना वाटायचे आहे. लाखो युवक इंटरनेट तटस्थतेच्या अधिकारासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कायद्यात सुधारणा घडवून नवा कायदा आणला जावा. केंद्रात संपुआचे सरकार असताना २०१२ मध्ये कोणाकोणाचे टिष्ट्वटर हँडल रोखण्यात आले ही बाब सर्वांना माहीत आहे. २ जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून १.१० लाख कोटी सरकारला मिळाले आहेत. यापूर्वी काय स्थिती होती ते सर्वांसमोर आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)