शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

IMFने मोदी सरकारला दिली खूशखबर, यावर्षी ९.५ टक्के दराने अर्थव्यवस्था वाढणार, २०२२मध्ये भारत ग्रोथ रेटमध्ये संपूर्ण जगाला मागे टाकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 07:17 IST

Indian Economy News: एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.

वॉशिंग्टन - एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ, महागाईचा भडका आणि कोळशाच्या टंचाईमुळे वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे. मात्र दुसरीकडे या संकटांच्या मालिकांदरम्यान, आर्थिक आघाडीवरून मोदी सरकारसाठी खूशखबर आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नव्या अंदाजानुसार २०२१ मध्ये भारताचीअर्थव्यवस्था ही ९.५ टक्के आणि २०२२ मध्ये ८.५ टक्के दराने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.३ टक्क्यांनी घटला होता. आयएमएफच्या नव्या आर्थिक चित्रामध्ये भारताच्या विकासाच्या अंदाजाला यावर्षी जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आपल्या आधीच्या अंदाजावर स्थिर ठेवण्यात आले आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या तुलनेत हा अंदाज १.६ टक्क्यांनी कमी आहे. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी नव्या डब्ल्यूईओनुसार २०२१ मध्ये संपूर्ण जगाचा विकास दर हा ५.९ टक्के तर २०२२ मध्ये ४.९ टक्के राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा यावर्षीचा विकास दर सहा टक्के आणि पुढील वर्षातील विकासदर ५.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. या पूर्वानुमानांनुसार चीनची अर्थव्यवस्ता २०२१ मध्ये आठ टक्के आणि २०२२ मध्ये ५.६ टक्के दराने वाढू शकते. आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, त्यांच्या जुलै महिन्यामधील अंदाजाच्या तुलनेमध्ये २०२१च्या जागतिक वृद्धीच्या अनुमानाला किंचित स्वरूपात संशोधित करून ५.९ टक्के करण्यात आले आहे. तसेच २०२२मध्ये ते ४.९ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था