शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

International Flights Resume India: देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरु होणार; कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या सावटाखाली निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 19:22 IST

India will start International Flights: गेल्या वर्षी 23 मार्चला आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही देशांसोबत एअर बबल पॅक्ट तयार करण्यात आले आणि काही प्रमाणावर विमान सेवा सुरु करण्यात आली होती.

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा येत्या 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरु केली जाणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा करून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली.

गेल्या वर्षी 23 मार्चला आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर काही देशांसोबत एअर बबल पॅक्ट तयार करण्यात आले आणि काही प्रमाणावर विमान सेवा सुरु करण्यात आली होती. सध्या भारताचा अशा 28 देशांसोबत एअर बबल पॅक्ट आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, युएई, केनिया, भूतान आणि फ्रान्स सारखे देश आहेत. या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे सुरु आहेत. 

एअर बबल करारांतर्गत, दोन देशांदरम्यान विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ निवडक एअरलाइन्सद्वारे चालविली जातात. तेथे प्रवास करण्यासाठी अनेक कठोर निर्बंध देखील आहेत. तथापि, नुकतेच नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले होते की सरकार आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्य करू इच्छित आहे. यानुसार आज निर्णय जाहीर करण्यात आला. आता कोरोनापूर्व परिस्थितीसारखी विमानसेवा सामान्य होणार आहे. 

29 नोव्हेंबरपासून सिंगापूर फ्लाइटया महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि सिंगापूर दरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावर सहमती झाली होती. या अंतर्गत, ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे ते आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतील आणि त्यांना क्वारंटाईनचे पालन देखील करावे लागणार नाही. भारत आणि सिंगापूर दरम्यान 29 नोव्हेंबरपासून उड्डाणे पुन्हा सुरू होणार आहेत. विस्तारानेही याबाबत घोषणा केली आहे.

14 देश वगळणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून भारत प्रतिबंधित १४ देश वगळता नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करेल. तथापि, या 14 देशांसह सध्याची एअर-बबल फ्लाइट व्यवस्था सुरूच राहील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या १४ देशांसाठी फ्लाइट्सवर बंदी कायम राहणार आहे त्यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळ