शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

Article 370: काश्मीर खरंच शांत? संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून वेगळेचं सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:51 IST

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर शांत असल्याचा सरकारचा दावा

नवी दिल्ली: कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा मोदी सरकारकडून करण्यात आला. अद्यापही सरकार आपल्या दाव्यावर ठाम आहे. मात्र संरक्षण दलांकडे असणाऱ्या कागदपत्रांमधून वेगळेची माहिती समोर आली आहे. कलम ३७० काढून टाकण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्याची आकडेवारी संरक्षण दलांच्या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. 'न्यूज१८'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये संसदेनं घेतला. या ऐतिहासिक निर्णयाला दोन महिने झाले आहेत. या कालावधीत काश्मीरमध्ये दगडफेकीच्या ३०६ घटना घडल्या आहेत. म्हणजेच काश्मीरात प्रत्येक दिवशी सरासरी पाच दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये सुरक्षा दलांचे जवळपास १०० जवान जखमी झाले. यापैकी ८९ जवान निमलष्करी दलाचे आहेत. काश्मीरमधील बहुतांश भागात शांतता असल्याचा दावा जम्मू काश्मीर प्रशासनानं केला. २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर काश्मीर पेटलं होतं. त्या तुलनेत सध्याची काश्मीरमधील स्थिती अतिशय चांगली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. २०१९ च्या पहिल्या सहा महिन्यात दगडफेकीच्या केवळ ४० घटना घडल्या होत्या, असंदेखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ६ ऑगस्टला संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरमधील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय होताच काश्मीरमधील अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काश्मीरमधील फोन आणि इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली. याशिवाय जवळपास ४ हजार लोकांना ताब्यात घेण्यात आलं. काश्मीरमधील अनेक प्रमुख नेत्यांना या काळात नजरकैदेत ठेवण्यात आलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370