शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:56 IST

मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली.

भोपाळ : सुरक्षेच्या आघाडीवर भारत फार नशीबवान नाही. कारण देशाचे लष्कर उत्तर आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर सातत्याने आव्हानांचा सामना करीत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या स्थितीत अगदी शांत राहून चालणार नाही, कारण शत्रू आतला असो वा बाहेरचा, तो कायम सक्रिय राहतो, असेही त्यांनी नमूद केले.

मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली.

२०४७ पर्यंत भारताला एक पूर्ण विकसित आणि स्वयंपूर्ण देश घडवण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारीवरही राजनाथसिंह यांनी भाष्य केले. यात लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून सतत सतर्क राहण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. 

प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचा केला गौरव ‘मी येथे आलो तेव्हा तुम्ही किती कठोर परिश्रमातून देशासाठी प्रशिक्षण घेत आहात ते मी पाहिले. हे युद्धापेक्षा कमी नाही.आपल्याला देशात आणि बाहेर सक्रिय असलेल्या शत्रूंवर लक्ष ठेवून प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील’, असे राजनाथसिंह यांनी नमूद केले. या केंद्रातील शिस्त तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचा राजनाथसिंह यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.

संरक्षण उत्पादनांची निर्यात वाढली केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारतीय संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीची उलाढाल २ हजार कोटीं रुपयांवरून २१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. २०२९ पर्यंत ही उलाढाल ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. भारतात बनविलेली संरक्षण उत्पादने अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मेक इन इंडिया या मोहिमेद्वारे स्वदेशात उत्तम संरक्षण उत्पादने तयार केली जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

अशी आहे महूची लष्करी छावणी- इंदूरहून २५ किमी दूर महू येथील लष्करी छावणीत तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत.- यात ‘आर्मी वॉर कॉलेज’, ‘मिलिट्री कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इन्फ्रन्ट्री स्कूल’चा समावेश आहे.- याशिवाय येथे संरक्षणविषयक संग्रहालय आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान