शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

आतील अन् बाहेरील शत्रू सक्रिय, कायम सतर्क राहा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; लक्ष ठेवून उपाययोजना करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:56 IST

मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली.

भोपाळ : सुरक्षेच्या आघाडीवर भारत फार नशीबवान नाही. कारण देशाचे लष्कर उत्तर आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर सातत्याने आव्हानांचा सामना करीत असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या स्थितीत अगदी शांत राहून चालणार नाही, कारण शत्रू आतला असो वा बाहेरचा, तो कायम सक्रिय राहतो, असेही त्यांनी नमूद केले.

मध्य प्रदेशात इंदूर जिल्ह्यातील महू छावणीच्या दोन दिवसीय दौऱ्यात दुसऱ्या दिवशी लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला. या शत्रूंवर सतत लक्ष ठेवून त्यांच्याविरुद्ध योग्य वेळी ठोस पावले उचलण्याची गरज राजनाथसिंह यांनी प्रतिपादित केली.

२०४७ पर्यंत भारताला एक पूर्ण विकसित आणि स्वयंपूर्ण देश घडवण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारीवरही राजनाथसिंह यांनी भाष्य केले. यात लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून सतत सतर्क राहण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. 

प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचा केला गौरव ‘मी येथे आलो तेव्हा तुम्ही किती कठोर परिश्रमातून देशासाठी प्रशिक्षण घेत आहात ते मी पाहिले. हे युद्धापेक्षा कमी नाही.आपल्याला देशात आणि बाहेर सक्रिय असलेल्या शत्रूंवर लक्ष ठेवून प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील’, असे राजनाथसिंह यांनी नमूद केले. या केंद्रातील शिस्त तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांचा राजनाथसिंह यांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.

संरक्षण उत्पादनांची निर्यात वाढली केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारतीय संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीची उलाढाल २ हजार कोटीं रुपयांवरून २१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. २०२९ पर्यंत ही उलाढाल ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. भारतात बनविलेली संरक्षण उत्पादने अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. मेक इन इंडिया या मोहिमेद्वारे स्वदेशात उत्तम संरक्षण उत्पादने तयार केली जात आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

अशी आहे महूची लष्करी छावणी- इंदूरहून २५ किमी दूर महू येथील लष्करी छावणीत तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत.- यात ‘आर्मी वॉर कॉलेज’, ‘मिलिट्री कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इन्फ्रन्ट्री स्कूल’चा समावेश आहे.- याशिवाय येथे संरक्षणविषयक संग्रहालय आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान