शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मोदी लाटेच्या भरवशावर राहू नका, लोक नाराज आहेत; 'त्या' अहवालानं भाजपची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:48 IST

अहवालानं भाजप, संघाचं टेन्शन वाढलं; भाजप नेतृत्त्वाकडून मंथन सुरू

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकार मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतरच निवडणूक घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षानंदेखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र बुद्धिजीवी वर्गानं दिलेल्या इशाऱ्यानं भाजपची चिंता वाढली आहे.

भाजपनं जम्मूच्या आर एस पुरामध्ये बुद्धिजिवींची बैठक बोलावली होती. त्यात झालेल्या मंथनानं भाजपची चिंता वाढली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे पक्षाविरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे, असं बुद्धिजिवींनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. काश्मीर खोऱ्यात मोदी लाटेच्या जीवावर पुढे जाऊ नका, असंदेखील बुद्धिजिवींनी सांगितलं.'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है', चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर संवेदनशील भाग असल्यानं भाजपनं आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत मोदींचा करिश्मा चालणार नाही असा बुद्धिजिवींचा अंदाज आहे. त्यांनी दिलेला अहवाल नुकताच दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पोहोचला. त्यामुळे भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंतादेखील वाढली आहे.'मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाजा वाटत नाही'; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

जम्मू-काश्मीरमध्ये तगडा चेहरा शोधण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्त्वाकडून सुरू आहे. त्यासाठी भाजप इतर पक्षातील नाराजांवर नजर ठेवून आहे. 'जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत भाजपनं मोदी लाटेच्या भरवशावर राहू नये. कारण लोकांच्या मनात सरकारच्या धोरणांबद्दल नाराजी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात नाराजी आहे,' असं बुद्धिजिवींना त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघJammu Kashmirजम्मू-काश्मीर