शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘आयएनएसव्ही तारीणी’चे बांधकाम गोव्यातच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 20:25 IST

नौदलाच्या सहा महिला अधिका-यांनी ज्या ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून विश्वभ्रमण केले ती बोट गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे. 

 - किशोर कुबल 

वेरें (गोवा) - नौदलाच्या सहा महिला अधिका-यांनी ज्या ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून विश्वभ्रमण केले ती बोट गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे. 

५५ फूट लांबीची ही बोट १८ फेब्रुवारी २0१७ रोजी ती नौदलाच्या ताफ्यात आली. लेफ्ट कमांडर वर्तिका जोशी यांनी या बोटीने सागर परिक्रमेत उत्तमरित्या साथ दिल्याबद्दल आभार मानले. जेमतेम १0 मिटर लांबीच्या या बोटीमध्ये सहाजणींचा १९४ दिवस वावर होता. 

या जलप्रवासासाठी महिला अधिकाºयांना योग्य ते प्रशिक्षण दिले गेले होते. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी ‘आयएनएसव्ही तारीणी’ आणि ‘आयएनएसव्ही म्हादई’ या बोटींवरुन २0 हजार सागरी मैलांचा प्रवास केलेला होता. यात मॉरिशस आणि गोवा ते केप टाउन जलप्रवासाचा यात समावेश होता. २0१६-२0१७ मध्ये या मोहिमा झालेल्या होत्या. ‘आयएनएसव्ही म्हादई’ बाबतचा उल्लेख लेफ्ट कमांडर वर्तिका यांनी आवर्जुन केला. कॅप्टन (निवृत्त) दिलीप दोंदे, कमांडर अभिलाष टॉमी यांच्या मार्गदर्शनाचाही वर्तिका यांनी उल्लेख केला. 

आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंती केली. ही सागरी परिक्रमा यशस्वी ठरल्याने देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठला आहे. 

 केंद्रीय संरक्षणमंत्री भारावून गेल्या 

विशेष म्हणजे निर्मला सीतारामन् यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये केंद्रात संरक्षणमंत्रीपदाचा ताबा घेतल्यानंतर तीन दिवसातच त्या वेरे येथे पहिल्या जाहीर कार्यक्रमासाठी आल्या. नौदलाच्या या तळावरुनच त्यानी या बोटीला १0 सप्टेंबर रोजी बावटा दाखवून सागरी परिक्रमेचा शुभारंभ करुन दिला त्यानंतर आता या नौदल महिला अधिकारी परिक्रमा पूर्ण करुन गोव्यात परतल्या तेव्हाही त्यांच्या स्वागतासाठी सीतारामन् आवर्जुन उपस्थित राहिल्या. संरक्षण दलात महिलांना अधिकाधिक वाव मिळावा यासाठी जे काही शक्य आहे ते केले जाईल, असे त्यावेळी त्यांनी जाहीर केले होते. महिला अधिकाºयांच्या या अजोड कामगिरीने त्या भारावून गेल्या आहेत. तसा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. 

 नौदलप्रमुखांचा नारी शक्तीला सलाम!

दरम्यान, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनिल लांबा म्हणाले की, नारी शक्तीला वाव देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या मोहिमेतून भारतीय महिलांचे कर्तृत्त्व जगाला दिसून आले आणि नारी शक्तीही कमी नाही, याची प्रचिती आली. महिलाही आव्हाने पेलू शकतात हे सिध्द झाले. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलgoaगोवा