शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

आता बँक खात्याला विम्याची सुरक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:50 IST

वित्त मंत्रालय, इर्डाईकडून पुढाकार; कंपन्यांची तयारी; पण कायद्यात करावा लागणार बदल

बंगळुरू : पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँक खात्यांना विम्याचे सुरक्षा कवच प्रदान करता येऊ शकते का, अशी विचारणा वित्त मंत्रालय आणि विमा नियामक इर्डाई यांनी विमा कंपन्यांना केली आहे. सध्या ‘ठेव विमा व कर्ज हमी महामंडळा’कडून (डीआयसीजीसी) फक्त एक लाख व त्यापेक्षा कमी ठेवींच्या बँक खात्यांनाच सुरक्षा कवच प्रदान करण्यात येते.विमा कंपन्यांनी या प्रस्तावावर विचारविनियम केला आहे. ठेवींना विमा सुरक्षा पुरविण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. तथापि, पुनर्विमा अडचणीचा ठरू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. ‘डीआयसीजीसी’नेही सध्याची विमा सुरक्षेची मर्यादा १ लाखावरून ३ ते ५ लाखांपर्यंत वाढविण्यावर विचार चालविला आहे, असे समजते.सूत्रांनी सांगितले की, बँक खात्यांना विमा संरक्षण पुरविण्याचा प्रस्ताव समोर आला असला तरी त्यावर लगेच काही निर्णय होईल, असे नाही. त्याला विलंब लागणार आहे. कारण त्यासाठी १९६१ च्या ‘ठेव विमा आणि कर्ज हमी महामंडळ कायद्या’त योग्य त्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. या सुधारणांनंतरच विमा कंपन्या बँक खात्यांना विमा संरक्षण देऊ शकतील.विमा शुल्क ठरवणारसूत्रांनी सांगितले की, १,००० रुपयांच्या ठेवीला विमा सुरक्षा पुरविण्यासाठी डीआयसीजीसीकडून सध्या १ रुपया आकारला जातो.विमा कंपन्यांकडून मात्र त्यापेक्षा थोडी जास्त रक्कम आकारली जाऊ शकते.व्यावसायिक बँका, विभागीय ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि इतरांच्या जोखिमेचा अभ्यास करून विमा शुल्क ठरविले जाऊ शकते.