शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे निर्देश; आरोग्य मंत्रालयाचा राज्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 05:53 IST

कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. याची आरोग्य मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्व कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचे तसेच सर्व क्षयरोग रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. मध्यप्रदेशसह आंध्रप्रदेश, हैदराबाद आणि तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना क्षयरोग झाल्याचे आढळले होते. दररोज सुमारे १२ रुग्णांना क्षयरोगाचे निदान होत असल्यामुळे डॉक्टरांचीही चिंता वाढली होती. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने अधिक चाचण्या करण्याची सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. ऑगस्ट २०२० पासूनच्या  कोरोना रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. क्षयरोग आणि कोरोना तसेच क्षयरोग आणि सारी या रुग्णांचीही तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कमी प्रतिकारशक्तीमुळे जंतू हल्ला करतात...

कोरोनामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय पुरावे नाहीत. मात्र, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास क्षयरोगाचे जंतू हल्ला करू शकतात. कोरोनाचे विषाणू किंवा उपचारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार