शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 09:29 IST

आयोगावर टीका ऐकतो तेव्हा मला केवळ भारताचा नागरिक म्हणूनच नव्हे, तर मी स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त राहिलो आहे आणि मी त्या संस्थेला थोडेसे योगदान दिले आहे म्हणून मला खूप चिंता आणि वेदना होतात.

नवी दिल्ली : मतचोरीच्या आरोपांना दिलेल्या उत्तरावरून निवडणूक आयोगावर टीका करीत माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी म्हटले की, आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अपमानजनक भाषा वापरण्याऐवजी त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते. त्यांच्या वक्तव्याने राहुल गांधींच्या आरोपांना बळ मिळाले आहे.

कुरेशी म्हणाले की, राहुल गांधींनी आरोप करताना वापरलेले बहुतेक शब्द, जसे की हायड्रोजन बॉम्ब इत्यादी, राजकीय वक्तव्य होते. त्यांनी दिलेल्या तक्रारींची सविस्तर चौकशी करायला हवी होती. बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दल कुरेशी यांनी आयोगावर टीका केली. याद्वारे आयोग केवळ भानुमतीचा पेटारा उघडत नाही तर मधमाश्यांच्या पोळ्याला हात लावत असून, यात त्यांचेच नुकसान होईल, असे म्हटले आहे.

ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार

आयोगावर टीका ऐकतो तेव्हा मला केवळ भारताचा नागरिक म्हणूनच नव्हे, तर मी स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त राहिलो आहे आणि मी त्या संस्थेला थोडेसे योगदान दिले आहे म्हणून मला खूप चिंता आणि वेदना होतात.

आयोगाला लोकांचा विश्वास जिंकावाच लागेल

‘डेमोक्रसीज हार्टलँड’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी ते म्हणाले की, निवडणूक आयोगानेही आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या सर्व शक्ती आणि दबावांना तोंड देणे त्यांच्यावर अवलंबून आहे.

त्यांना लोकांचा विश्वास जिंकावा लागेल. विरोधी पक्षांचा विश्वास जिंकावा लागेल. मी नेहमीच विरोधी पक्षांना प्राधान्य दिले आहे. कारण ते कमकुवत आहेत.

कुरेशी म्हणाले की, आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र दाखल करण्यास सांगण्याऐवजी आरोपांची चौकशी करायला हवी होती. कुरेशी २०१० ते २०१२ दरम्यान निवडणूक आयुक्त होते.

विरोधी पक्षांचे आता कोणी ऐकत नाही...

कुरेशी म्हणाले की, सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षासारखी विशेष काळजी घेण्याची गरज नाही. कारण ते सत्तेत असतात, तर विरोधी पक्ष सत्तेत नसतो. मी मुख्य निवडणूक आयुक्त असताना माझ्या कर्मचाऱ्यांना सामान्यतः सूचना देण्यात आल्या होत्या की, जर विरोधी पक्षांना अपॉइंटमेंट हवी असेल तर दरवाजे उघडे ठेवा आणि त्यांना ताबडतोब वेळ द्या. त्यांचे ऐका, त्यांच्याशी बोला.

त्यांना कोणतीही छोटीशी मदत हवी असेल तर ती करा. जर इतर कोणाचेही नुकसान होत नसेल तर ती मदत करा. आता विरोधी पक्षांना वारंवार सर्वोच्च न्यायालयात जावे लागत आहे आणि प्रत्यक्षात २३ पक्षांना असे म्हणावे लागले आहे की, त्यांना अपॉइंटमेंट मिळत नाही आणि कोणीही त्यांचे ऐकत नाही.

प्रतिज्ञापत्र देणार का?

मी अनेकदा म्हटले आहे की, समजा विरोधी पक्ष म्हणतात, ठीक आहे, तुम्ही नवीन मतदार यादी सादर करीत आहात, त्यात कोणतीही चूक नाही असे प्रतिज्ञापत्र द्या आणि जर काही चूक असेल तर तुमच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, अशा परिस्थितीची तुम्ही कल्पना करू शकता का?

आयोगाने आरोपांची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते. केवळ विरोधी पक्षनेतेच नाही तर जर कोणी तक्रार केली असेल तर तात्काळ चौकशीचे आदेश देणे ही सामान्य प्रक्रिया आहे.

आयोगाचे वर्तन आक्षेपार्ह, अपमानजनक का आहे?

ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी ज्या प्रकारची भाषा वापरली ती वापरायला नको होती. आपल्याला माहीत असलेले हे निवडणूक आयोग नाही. शेवटी, ते विरोधी पक्षनेते आहेत.

ते सामान्य माणूस नाहीत. ते लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते लाखो लोकांचे मत व्यक्त करीत आहेत आणि त्यांना सांगणे, प्रतिज्ञापत्र द्या, नाही तर आम्ही हे करू, आम्ही ते करू, हे आयोगाचे वर्तन आक्षेपार्ह आणि अपमानजनक आहे.

नेपाळमधील घडामोडी अराजकतेचे लक्षण नसून 'चैतन्यशील लोकशाहीचे' लक्षण आहे, असेही कुरेशी यांनी म्हटले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा