शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेल्वेच्या जेवणात किडे, झुरळे! कॅटरिंग सेवेविरोधात प्रवाशांच्या ६,९४८ तक्रारी, ५०० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 14:34 IST

माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने विविध माहिती दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग सेवेविरोधातील म्हणजेच रेल्वेत पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या विरोधातील तक्रारींत मार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ५०० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय रेल्वे कॅटरिंग व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) दिली आहे. रेल्वेतील जेवणात माश्या, किडे, धुळ, उंदीर आणि झुरळे आढळून असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

माहिती अधिकाराच्या अर्जावर दिलेल्या उत्तरात ‘आयआरसीटीसी’ने ही माहिती दिली आहे. या कालावधीत वंदे भारत, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल एक्स्प्रेस यांसारख्या आलिशान गाड्यांतील जेवणाबाबतही लोकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.

  • वर्षभरात कमालीची वाढ

रेल्वेतील अन्नाबाबतच्या प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींची संख्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वाढून ६,९४८ झाली. मार्च २०२२ च्या अखेरीस ती अवघी १,१९२ इतकी होती. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२४ या काळात मिळालेल्या एकूण तक्रारींची संख्या ११,८५० इतकी होती. 

६८ आस्थापनांना कारणे दाखवा

  • आयआरसीटीसी’ने म्हटले की, ‘आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना ६८ कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जानेवारी २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत ३ कॅटरिंग कंत्राटे रद्द करण्यात आली.’ 
  • वास्तविक एका वृत्तानुसार, ‘आयआरसीटीसी’कडे १,५१८ कॅटरिंग करार होते. त्यापैकी फक्त ३ करार रद्द झाले आहेत.  २०१७ मध्ये नियंत्रक व महालेखापाल (कॅग) यांच्या ऑडिट अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. 
  • रेल्वेतील जेवणात माश्या, किडे, धूळ, उंदीर आणि झुरळे आढळून आली.
टॅग्स :railwayरेल्वे