शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 16:14 IST

जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या.

श्रीनगर : काही वाईट शक्तींनी धर्माच्या नावाखाली माथी भडकविल्याने काश्मीरचा एक तरुम जिहादी बनण्यासाठी घर सोडून निघाला होता. यावेळी त्याच्या मनात एकच गोष्ट भिनभिनत होती की, काश्मिरींचे आणि इस्लामचे दुश्मन केवळ भारतीय फौजच आहे. अशातच जेव्हा त्याच्या हातात असॉल्ट रायफल मिळाली तेव्हा त्याने व्हिडिओ बनवत भारतीय सैन्याला हरविणार, कारण ते काश्मीरचे दुश्मन आहेत, असे सांगितले होते.  

मात्र, जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या. आता एका हॉस्पिटलच्या खाटेवर झोपलेला आरिफ भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना सांगतोय की त्याच्याकडून चूक झाली. मला तुमच्यासारखी वर्दी घालायला हवी होती आणि देशाच्या संरक्षणासाठी बंदूक हातात धरायला हवी होती. 

 

दक्षिण काश्मीरच्या बिजबाहाडाच्या फतेहपोरामध्ये आरिफ हुसैन बट राहत होता. त्याला आणि त्याच्या अन्य एक साथीदार आदील अहमद यांना गेल्या रात्री हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी एका बैठकीसाठी बोलावले होते. अंधारातच हे दोघे दहशतवाद्यांना भेटायला पोहोचले होते. आरिफला असे वाटले होते की, हिज्बुल आणि लष्कराचे दहशतवादी आमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले असतील. ते आमच्यासोबत मिळून भारतीय सैन्यावर हल्ला करणार असतील. मात्र मी चुकीचा होतो. 

आरिफच्या म्हणण्यानुसार, आम्ही जेव्हा बागेत पोहोचलो तेव्हा आम्हाला घेरण्यात आले. आमच्यावर जिहादचे दुश्मन आणि पाकिस्तानच्या विरोधात गेल्याचा आरोप करण्यात आला. मारहाण करत आमच्याकडील शस्त्रे काढून घेतली. आदिलला माझ्यासमोरच गोळ्यांनी ठार करण्यात आले. पण त्यांनी मला मारले नाही. त्यांनी हिज्बुल किंवा लश्करमध्ये सहभागी होण्यास सांगितले. जेव्हा मी पळायला लागलो तेव्हा त्यांनी माझ्या पायावर गोळी मारली आणि सांगितले की तू नवीन आहेस म्हमून तुला सोडतोय.

आरिफला वाटले की आता आपल्याला भारतीय जवान सोडणार नाहीत. पोलिस येऊन मला गोळ्या घालतील. गोळी लागल्याने वेदना होत होत्या. जेव्हा जवान आणि काही नागरिक तेथे आले तेव्हा मला कोणी मारले नाही. जवानांनी फक्त एवढेच सांगितले की हत्यारे असतील तर खाली ठेव. तेव्हा त्याने जवानांना सांगितले की, मला गोळी लागलीय. त्यावर जवानाचे उत्तर ऐकून आरिफला रडू कोसळले. भारतीय जवानाने त्याला सांगितले होते, थोडक्यात वाचलायस, आम्ही तुला मरण्यासाठी असेच सोडून जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तुझे कुटुंबीयही तुला पाहण्यासाठी आतुरलेले असतील. माफी मागायचीच असेल तर त्यांची माग. 

आरिफला शिक्षा होईल की नाही हे माहिती नाही. पण त्याने सांगितले की, त्याला आता पुरते माहिती झाले आहे की त्यांच्या शत्रू कोण आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा मशीदीत जाऊन माझ्यासारख्या तरुणांना फितवणाऱ्या शत्रूंविरोधात जिहाद पुकारणार असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान