शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

Narayana Murthy: “घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव”; इन्फोसिसचे नारायण मूर्ती स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:07 IST

नारायण मूर्ती यांनी या कार्यक्रमात बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केल्याचे सांगितले जात आहे.

Narayana Murthy: देशभरातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवर तापलेले आहे. विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच सामाजिक विषयांवर वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडणारे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे. भारत आणि सिंगापूरमधील परिस्थितीची तुलना करताना विद्यार्थ्यांना पुढे येऊन नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन नारायण मूर्ती यांनी केले.

आंध्र प्रदेशमधील विझियानगरम जिल्ह्यातील राजम भागात असणाऱ्या जीएमआर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात नारायण मूर्ती बोलत होते. आपण सगळ्यांनीच कोणत्याही कमतरतेकडे बदलाची एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वतः नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे नारायण मूर्ती उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. 

घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव

नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना भारत आणि सिंगापूरमधील वास्तवातला फरत सांगितला. भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण आणि वीजेची कमतरता आहे. तर दुसरीकडे सिंगापूरमधील वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, प्रदूषण नाही आणि भरपूर वीज आहे. अशा परिस्थितीत ते नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे मूर्ती यांनी नमूद केले. तरुणांनी समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता घडवायला हवी. आपल्या स्वत:च्या हिताच्याही आधी लोकांचे, समाजाचे आणि देशाचे हित ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.  

दरम्यान, एन. नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केली. संस्थापकांच्या मुलांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ नये, अशी भूमिका मांडणे ही माझी चूक होती. संस्थापकांच्या पुढच्या पिढीला इन्फोसिसमधून बाहेर ठेवणे ही चूक होती, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. त्यावेळेस असलेल्या सरकारने आवश्यक ते निर्णय वेळेवर घेतले नाहीत. अशा परिस्थितीत अडचणीत वाढ झाली. आजचे तरुणांचे विचार भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनबरोबर स्पर्धा करू शकतात, असे ते म्हणाले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसCentral Governmentकेंद्र सरकार