शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Narayana Murthy: “घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव”; इन्फोसिसचे नारायण मूर्ती स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:07 IST

नारायण मूर्ती यांनी या कार्यक्रमात बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केल्याचे सांगितले जात आहे.

Narayana Murthy: देशभरातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवर तापलेले आहे. विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच सामाजिक विषयांवर वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडणारे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे. भारत आणि सिंगापूरमधील परिस्थितीची तुलना करताना विद्यार्थ्यांना पुढे येऊन नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन नारायण मूर्ती यांनी केले.

आंध्र प्रदेशमधील विझियानगरम जिल्ह्यातील राजम भागात असणाऱ्या जीएमआर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात नारायण मूर्ती बोलत होते. आपण सगळ्यांनीच कोणत्याही कमतरतेकडे बदलाची एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वतः नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे नारायण मूर्ती उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. 

घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव

नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना भारत आणि सिंगापूरमधील वास्तवातला फरत सांगितला. भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण आणि वीजेची कमतरता आहे. तर दुसरीकडे सिंगापूरमधील वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, प्रदूषण नाही आणि भरपूर वीज आहे. अशा परिस्थितीत ते नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे मूर्ती यांनी नमूद केले. तरुणांनी समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता घडवायला हवी. आपल्या स्वत:च्या हिताच्याही आधी लोकांचे, समाजाचे आणि देशाचे हित ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.  

दरम्यान, एन. नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केली. संस्थापकांच्या मुलांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ नये, अशी भूमिका मांडणे ही माझी चूक होती. संस्थापकांच्या पुढच्या पिढीला इन्फोसिसमधून बाहेर ठेवणे ही चूक होती, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. त्यावेळेस असलेल्या सरकारने आवश्यक ते निर्णय वेळेवर घेतले नाहीत. अशा परिस्थितीत अडचणीत वाढ झाली. आजचे तरुणांचे विचार भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनबरोबर स्पर्धा करू शकतात, असे ते म्हणाले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसCentral Governmentकेंद्र सरकार