शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या खुर्चीला धोका नसल्याची सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 17:26 IST

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.

ठळक मुद्दे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

नवी दिल्ली, दि. 26- हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणं आलं होतं. राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याविषयी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चादेखील करण्यात आली. पण यामध्ये खट्टर यांच्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही. यासोबतच पक्षाकडून त्यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितलं जाणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

हरयाणातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला हरयाणाचे प्रभारी अनिल जैन, कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते. या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा घेण्याचा विचार सध्या तरी पक्षाच्या नेतृत्त्वाकडून करण्यात आलेला नाही. याशिवाय खट्टर यांना दिल्लीत बोलावून त्यांना समज दिली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचंही भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांना पक्ष नेतृत्त्वाने दिल्लीत बोलावल्याची बातमी चुकीची आहे, असे प्रभारी अनिल जैन यांनी सांगितलं. याशिवाय विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘डेरा आणि त्याचं महत्त्व नाकारता येणार नाही,’ असं अमित शहा यांनी बैठकीत बोलाताना म्हटलं. ‘डेराचं महत्त्व लक्षात घेता परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यात आली,’ असं ते पुढे म्हणाले. प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरलं आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे.