शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या खुर्चीला धोका नसल्याची सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 17:26 IST

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.

ठळक मुद्दे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं.राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

नवी दिल्ली, दि. 26- हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं होतं. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणं आलं होतं. राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची खुर्ची जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याविषयी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली चर्चादेखील करण्यात आली. पण यामध्ये खट्टर यांच्या राजीनाम्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नाही. यासोबतच पक्षाकडून त्यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितलं जाणार नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

हरयाणातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला हरयाणाचे प्रभारी अनिल जैन, कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते. या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा घेण्याचा विचार सध्या तरी पक्षाच्या नेतृत्त्वाकडून करण्यात आलेला नाही. याशिवाय खट्टर यांना दिल्लीत बोलावून त्यांना समज दिली जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचंही भाजपाकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांना पक्ष नेतृत्त्वाने दिल्लीत बोलावल्याची बातमी चुकीची आहे, असे प्रभारी अनिल जैन यांनी सांगितलं. याशिवाय विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘डेरा आणि त्याचं महत्त्व नाकारता येणार नाही,’ असं अमित शहा यांनी बैठकीत बोलाताना म्हटलं. ‘डेराचं महत्त्व लक्षात घेता परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यात आली,’ असं ते पुढे म्हणाले. प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरलं आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे.