शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता महागाईमुळे कंबरडे मोडणार?; ‘या’ वस्तू भाव खाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 07:31 IST

‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न

नवी दिल्ली : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत, तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. कोरोनामुळे खिशावर परिणाम झाला असताना आता किचनचे बजेट कोलमडणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकार खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या विचारात आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कँटिन सुरू झाल्यानंतर भाज्या आणि फळांचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यात आता खाद्य तेलाच्या वाढत्या दरांची भर पडू शकते. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली. त्यामुळे आयात शुल्क वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. देश मोठ्या प्रमाणात मलेशियाकडून पाम तेलाची आयात करतो. आयात शुल्कात वाढ केल्यास पाम तेलाची किंमत वाढेल. त्यामुळे आयात घटेल.तेल आयातीवर कोट्यवधींचा खर्चखाद्य तेलावरील सरकारचा आयात खर्च गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतातील मागणीच्या ७० टक्के खाद्य तेल आयात केले जाते. यावर दरवर्षी १० अब्ज डॉलर खर्च होतात. भारतात राई, सोयाबीन, सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर ३५ टक्के आयात शुल्क आकारण्यात येते. तर रिफाईंड पाम तेलावर ३७.५ टक्के आयात शुल्क आकारले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी