शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

निकृे्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:21 IST

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देसिन्नर-निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्यावर चालु होते काम

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे.सिन्नर तालुक्यातील नायगाव व निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी या दोन तालुक्यांना जोडणा-या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र सुरु असलेले काम संबंधित ठेकेदार मनमानी करून निकृष्ट दर्जाचे होत आहे.या रस्त्यावर चार ठिकाणी नाल्यांवर मो-यांची गरज असतांना येथे अरूंद रस्ता बनविल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर टाकली जाणारी खडी निकृष्ट असून डांबराचे प्रमाण अल्प असल्याने रस्ता आत्ताच उखडत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होती. मात्र सदर रस्ता दोन वर्षापासून काम सुरू असुन अजूनही पूर्ण झाले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अपूर्ण कामामुळे परिसरातील पिंपळगाव, तळवाडे, महाजनपूर, भेंडाळी, बेरवाडी व नायगाव आदी गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सदर ठेकेदार रस्त्याचे काम खराब करत असल्याची तक्रार करूनही संबंधित अधिकारी आणि गावातील काही अज्ञात व्यक्ती कामाला मदत करत असल्याची तक्रार मंगेश कातकाडे, सुनिल कातकाडे, भारत जेजुरकर, मारूती भांगरे, महेंद्र साठे आदींसह ग्रामस्थ करत आहे.सिन्नर - निफाड या दोन तालुक्याना जोडणा-या नायगाव - पिंपळगाव या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRural Developmentग्रामीण विकास