शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Inequality In India: आनंद साजरा करायचा की चिंता! गरीबांचा जीव जातोय, पण १४२ जणांकडे देशाच्या ४० टक्के संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 13:43 IST

Oxfam report: वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी Oxfam ने अहवाल दिला आहे. यानुसार भारतात २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या वर्षभरात ४० ने वाढली आहे.

भारतात गरीब आणखी गरीब होत आहेत, श्रीमंत आणखी श्रीमंत. आज देशातील अब्जाधीशांचा आकडा हेच सांगत आहे. देशातील आर्थिक विषमता चिंताजनक प्रकारे वाढू लागली आहे. भारतात अब्जाधीशांची संख्या १४२ वर गेली असून याच लोकांकडे देशाच्या ४० टक्के संपत्तीचा वाटा आहे. दुसरीकडे देशातील ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी झाले आहे. 

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी Oxfam ने अहवाल दिला आहे. यानुसार भारतात २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या वर्षभरात ४० ने वाढली आहे. २०२१ मध्ये ही संख्या १०२ होती. या १४२ अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढून 720 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. ही देशाच्या गरीबांच्या संपत्तीपेक्षाही जास्त आहे. 

कोरोनामुळे लोकांचे उत्पन्न बुडालेले असताना दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे लोकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या. कंपन्या बंद करण्याची वेळ आली, परंतू दुसरीकडे उद्योजकांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. 

अमेरिका, चीननंतर भारत...ऑक्सफेमच्या अहवालानुसार भारत अब्जाधीशांच्या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात. यानंतर चीनचा नंबर लागतो. परंतू फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झरलँड या तीन देशांमध्ये मिळून जेवढे अब्जाधीश नाहीत, तेवढे एकट्या भारतात झाले आहेत. 

ऑक्सफेम इंडियाचे सीईओ Amitabh Behar यांनी सांगितले की, ही आर्थिक असमानता फक्त भारतातच नाही तर जगातही आहे. कोरोना महामारी हे कारण बनले आहे. आर्थिक असमानतेमुळे जगभरात दिवसाला २१ हजार मृत्यू होत आहेत. म्हणजेच दर चार सेकंदाला एक मृत्यू होत आहे.

टॅग्स :MONEYपैसा