शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
4
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
5
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
6
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
7
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
8
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
9
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
10
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
11
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
12
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
13
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
14
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
15
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
16
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
17
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
18
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
19
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
20
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
Daily Top 2Weekly Top 5

Inequality In India: आनंद साजरा करायचा की चिंता! गरीबांचा जीव जातोय, पण १४२ जणांकडे देशाच्या ४० टक्के संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 13:43 IST

Oxfam report: वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी Oxfam ने अहवाल दिला आहे. यानुसार भारतात २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या वर्षभरात ४० ने वाढली आहे.

भारतात गरीब आणखी गरीब होत आहेत, श्रीमंत आणखी श्रीमंत. आज देशातील अब्जाधीशांचा आकडा हेच सांगत आहे. देशातील आर्थिक विषमता चिंताजनक प्रकारे वाढू लागली आहे. भारतात अब्जाधीशांची संख्या १४२ वर गेली असून याच लोकांकडे देशाच्या ४० टक्के संपत्तीचा वाटा आहे. दुसरीकडे देशातील ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी झाले आहे. 

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी Oxfam ने अहवाल दिला आहे. यानुसार भारतात २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या वर्षभरात ४० ने वाढली आहे. २०२१ मध्ये ही संख्या १०२ होती. या १४२ अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढून 720 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. ही देशाच्या गरीबांच्या संपत्तीपेक्षाही जास्त आहे. 

कोरोनामुळे लोकांचे उत्पन्न बुडालेले असताना दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे लोकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या. कंपन्या बंद करण्याची वेळ आली, परंतू दुसरीकडे उद्योजकांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. 

अमेरिका, चीननंतर भारत...ऑक्सफेमच्या अहवालानुसार भारत अब्जाधीशांच्या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात. यानंतर चीनचा नंबर लागतो. परंतू फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झरलँड या तीन देशांमध्ये मिळून जेवढे अब्जाधीश नाहीत, तेवढे एकट्या भारतात झाले आहेत. 

ऑक्सफेम इंडियाचे सीईओ Amitabh Behar यांनी सांगितले की, ही आर्थिक असमानता फक्त भारतातच नाही तर जगातही आहे. कोरोना महामारी हे कारण बनले आहे. आर्थिक असमानतेमुळे जगभरात दिवसाला २१ हजार मृत्यू होत आहेत. म्हणजेच दर चार सेकंदाला एक मृत्यू होत आहे.

टॅग्स :MONEYपैसा