शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:02 IST

इंदूर-मनमाड ३०९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून अनेक महत्त्वाची शहरे यामुळे जोडली जाणार आहेत.

Indore Manmad Rail Project:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने एकूण १८,०३६ कोटी रुपये  खर्चाच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. इंदूर आणि मनमाड नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. हा प्रकल्प मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पंतप्रधान-गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅनच्या अंतर्गत असणार आहे. ३०९ किमी लांबीच्या नवीन रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संपर्क नसलेली क्षेत्रे देखील जोडली जाणार आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाण्यासाठी गुजरातमार्गे जावं लागत आहे. मुंबई आणि इंदूरला महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे आहेत. त्यामुळे आता इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार असून केंद्राने त्याला मंजुरी दिली आहे. मुंबई आणि इंदूर दरम्यानचा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील राज्यातील सहा जिल्ह्यांना जोडणार आहे. ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान रेल्वेच्या जाळ्यामध्ये ३०९ किलोमीटरची भर पडेल. या प्रकल्पासह ३० नवीन स्थानके बांधली जातील. नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे १,००० गावे आणि सुमारे ३० लाखांना जोडला जाणार आहे. यामुळे व्यापारासह श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदूर विभागातील अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढेल.

हा रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्हा आणि मध्य प्रदेशातील बरवानी, खरगोन, धार आणि इंदूर जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामुळे मनमाड आणि महू ही महत्त्वाची स्थानके जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च १८,०३६ कोटी रुपये असून तो २०२८-२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. यासह मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट जोडले जातील, ज्यामुळे देशाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागात त्याचे वितरण सुलभ होईल.

सध्या इंदूर ते मुंबई दरम्यानचे रेल्वे मार्गाचे अंतर ६५० किलोमीटर आहे. मात्र इंदूर मनमाड रेल्वे मार्गानंतर हे अंतर १०० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल वर्षभरापूर्वी तयार करण्यात आला होता. मनमाड ते धुळे दरम्यान ६० किलोमीटर लांबीचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान, कृषी उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड, पोलाद, सिमेंट, पीओएल इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाला तयार होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणात थेट रोजगार निर्माण होणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशIndian Railwayभारतीय रेल्वे