शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:02 IST

इंदूर-मनमाड ३०९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून अनेक महत्त्वाची शहरे यामुळे जोडली जाणार आहेत.

Indore Manmad Rail Project:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने एकूण १८,०३६ कोटी रुपये  खर्चाच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत इंदूर-मनमाड रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. इंदूर आणि मनमाड नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. हा प्रकल्प मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पंतप्रधान-गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅनच्या अंतर्गत असणार आहे. ३०९ किमी लांबीच्या नवीन रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संपर्क नसलेली क्षेत्रे देखील जोडली जाणार आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाण्यासाठी गुजरातमार्गे जावं लागत आहे. मुंबई आणि इंदूरला महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे आहेत. त्यामुळे आता इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार असून केंद्राने त्याला मंजुरी दिली आहे. मुंबई आणि इंदूर दरम्यानचा रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील राज्यातील सहा जिल्ह्यांना जोडणार आहे. ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान रेल्वेच्या जाळ्यामध्ये ३०९ किलोमीटरची भर पडेल. या प्रकल्पासह ३० नवीन स्थानके बांधली जातील. नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे १,००० गावे आणि सुमारे ३० लाखांना जोडला जाणार आहे. यामुळे व्यापारासह श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदूर विभागातील अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढेल.

हा रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्हा आणि मध्य प्रदेशातील बरवानी, खरगोन, धार आणि इंदूर जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामुळे मनमाड आणि महू ही महत्त्वाची स्थानके जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च १८,०३६ कोटी रुपये असून तो २०२८-२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. यासह मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट जोडले जातील, ज्यामुळे देशाच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागात त्याचे वितरण सुलभ होईल.

सध्या इंदूर ते मुंबई दरम्यानचे रेल्वे मार्गाचे अंतर ६५० किलोमीटर आहे. मात्र इंदूर मनमाड रेल्वे मार्गानंतर हे अंतर १०० किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल वर्षभरापूर्वी तयार करण्यात आला होता. मनमाड ते धुळे दरम्यान ६० किलोमीटर लांबीचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान, कृषी उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड, पोलाद, सिमेंट, पीओएल इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाला तयार होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणात थेट रोजगार निर्माण होणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशIndian Railwayभारतीय रेल्वे