शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

भारत-पाक २००३ च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करणार

By admin | Updated: September 23, 2015 00:47 IST

सीमेवरील गोळीबाराचे लक्ष्य ठरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने चिंता जाहीर केली

नगरोटा (जम्मू-काश्मीर) : सीमेवरील गोळीबाराचे लक्ष्य ठरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने चिंता जाहीर केली असून उभयतांमध्ये इ. स.२००३ च्या शस्त्रसंधी करारातील सिद्धांतांचे तंतोतंत पालन करण्यावर सहमती झाली असल्याची माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली.१६ व्या कोरचे जनरल आॅफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल आर.आर. निंभोरकर यांनी मंगळवारी येथे एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर शांतता आणि सौहार्द राखण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणा स्थापन केल्या जाणार आहेत. दोन्ही बाजूंचे याशिवायही अनेक मुद्यांवर एकमत झाले आहे. पूंछमध्ये सोमवारी झालेल्या ध्वज बैठकीतील निष्कर्षांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. आम्ही काही कठोर संदेश देण्याच्या हेतूने ध्वज बैठकीला गेलो नव्हतो असे स्पष्ट करताना निंभोरकर म्हणाले, या बैठकीचा मुख्य उद्देश सीमेवर शांतता आणि सौहार्द कायम कसे राखता येईल याबाबत उपाययोजना करणे हा होता. कारण गोळीबारात दोन्ही देशांचे नागरिक ठार झाले आहेत. नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. बैठकीतील निर्णयाबाबत पाकिस्तानवर विश्वास ठेवता येणार काय, असा प्रश्न विचारला असता ते आश्वासन पाळणार नाहीत असे वाटत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पाकसमर्थित दहशतवाद आणि घुसखोरीचा मुद्दा मात्र या बैठकीत चर्चेला आला नाही.(वृत्तसंस्था)