शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भारत-चीन संबंध रुळावर, द्विपक्षीय बैठकीचे फलित; मोदी-जीनपिंग यांचा पुनरावृत्ती टाळण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:56 IST

डोकलाम वाद मागे सारत भारत- चीनने मंगळवारी संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला सहमती दर्शविली. चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना संबंध रुळावर आणण्याबाबत इच्छा व्यक्त केली.

शियामेन : डोकलाम वाद मागे सारत भारत- चीनने मंगळवारी संबंध पूर्ववत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याला सहमती दर्शविली. चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करताना संबंध रुळावर आणण्याबाबत इच्छा व्यक्त केली.सिक्कीममधील डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकल्यानंतर भारत आणि चीनचे संबंध कधी नव्हे तेवढे ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर जीनपिंग यांच्याशी झालेली चर्चा फलदायी ठरल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. डोकलामसारख्या वादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन देशांच्या सैनिकांदरम्यान सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यालाही या नेत्यांनी बैठकीत सहमती दर्शविली.जीनपिंग यांना भेटलो. द्विपक्षीय संबंधांबाबत आमची चर्चा फलदायी ठरली आहे, असे ट्विट मोदी यांनी या बैठकीनंतर केले. ही बैठक रचनात्मक ठरली असून संबंध सुधारण्याच्या दिशेने दोन्ही देश पुढे वाटचाल करण्याच्या बाजूने आहेत. संबंध बळकट करण्यासाठी सीमेवर शांतता आणि सलोखा राखणे गरजेचे आहे, यावर या बैठकीत सहमती दर्शविली गेली, असे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.डोकलाम प्रकरण मागे पडले काय? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ही चर्चा भविष्याच्या दिशेने जाणारी होती. मागे वळण्याचा प्रश्नच नाही. मोदी आणि जीनपिंग यांनी संयुक्त आर्थिक गट, सुरक्षा गट आणि रणनीती गटांसारख्या आंतर सरकारी यंत्रणेवर चर्चा केली.७३ दिवसांनंतर वाद संपुष्टात...डोकलाममध्ये दोन्ही देशांचे जवान आमने-सामने उभे ठाकल्यानंतर ७३ दिवस तणावाचे वातावरण असताना राजनैतिक पातळीवरील प्रयत्न वाद संपुष्टात आणण्यासाठी कामी आले. चीनच्या लष्कराने डोकलाममध्ये रस्त्याचे सुरू केलेले काम १६ जून रोजी भारतीय जवानांनी थांबविल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. २८ आॅगस्ट रोजी दोन्ही देशांच्या विदेश मंत्रालयाने सैन्य माघारीची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांना पुढील वाटचालीला मदत मिळेल. परस्पर विश्वास बळकट करण्यासह सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील जवानांमध्ये संपर्क आणि सहकार्य वाढविण्यावर भर दिला जावा जेणेकरून अलीकडे घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. दोन शेजारी किंवा शक्तिशाली देशांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहेत, मात्र ते परस्परांविषयी आदरभाव ठेवून सोडवायला हवे. वाद निकालात काढण्यासाठी समान आधार निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे, असेही जयशंकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीन