शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
4
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
5
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
6
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
7
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
8
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
9
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
10
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
11
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
13
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
14
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
15
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
16
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
17
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
18
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
19
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
20
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:02 IST

IndiGo: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, इंडिगो संकटावर पंतप्रधान मोदींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

IndiGo Crisis: देशातील आघाडीची एअरलाइन इंडीगो मोठ्या संकटात सापडली आहे. शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे देशभरातील प्रवाशंमध्ये गोंधळ उडाला असून, हजारो प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय. या सर्व परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असल्याची माहिती केंद्रीय संसदीय व अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. 

कायद्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये

NDA संसदीय दलाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रिजिजू म्हणाले की, पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रवाशांना कोणत्याही परिस्थितीत गैरसोय होता कामा नये. व्यवस्था दुरुस्त करण्याच्या नावाखाली नागरिकांना त्रास देणे योग्य नाही. चांगले शासन म्हणजे लोकांना सुविधा देणे, त्रास देणे नव्हे. नियम आणि कायदे योग्य असले तरी त्यांची अंमलबजावणी जनसामान्यांना त्रास न होऊ देता करावी, असेही मोदींनी स्पष्ट केले. 

Indigo संकटात का आली?

देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगोने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संकटावर एक सविस्तर रिपोर्ट सरकारला सादर केला. 3 डिसेंबरपासून सुरू झालेल्या सावळागोंधळामुळे आतापर्यंत 3900 हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. 

इंडिगोने पत्रात म्हटले की, हे संकट कुठल्या एका कारणामुळे ओढावले नाही, तर त्यामागे अनेक कारणे आहेत. विंटर शेड्युल्ड लागू झाल्यानंतर काही बदल, तांत्रिक बिघाड, खराब वातावरण, एअरस्पेसमध्ये गर्दी आणि एफडीटीएल फेज टू अंतर्गत नव्या पायलट ड्युटी नियमांमुळे हा गोंधळ उडाला आहे. या सर्व घटकांमुळे वैमानिकांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली हे कंपनीने मान्य केले. 

सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.  जी क्रू व्यवस्थापन, कर्मचारी नियोजन आणि FDTL नियमांचे पालन होते का नाही, ते तपासेल. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी समितीसमोर हजर राहतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't trouble citizens with rules: PM Modi on IndiGo crisis

Web Summary : PM Modi expressed concern over IndiGo flight cancellations causing passenger distress. He emphasized that rules should ease, not trouble, citizens. IndiGo cited multiple reasons for cancellations, including weather and pilot duty regulations. A high-level committee will investigate the situation.
टॅग्स :IndigoइंडिगोNarendra Modiनरेंद्र मोदीairplaneविमानParliamentसंसद