शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोची मोठी घोषणा; प्रवाशांना ३ ते १५ डिसेंबरपर्यंत रद्द झालेल्या विमानांचे १०० टक्के रिफंड मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 22:55 IST

तिकीट बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी आता प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले.

Indigo Crisis: देशभरातील विमान प्रवाशांना मोठा दिलासा देत, खासगी विमान कंपनी इंडिगोने नुकत्याच झालेल्या विमान रद्द करण्याच्या संकटानंतर महत्त्वाचे अपडेट दिले आहे. ३ ते १५ डिसेंबर या कालावधीत रद्द झालेल्या सर्व विमानांचे तिकिटांचे पैसे रिफंड करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची घोषणा कंपनीने सोमवारी केली. या मोठ्या गोंधळामुळे आणि हजारो प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल इंडिगोने दिलगिरी व्यक्त केली आहे.

'नो क्वेश्चन आस्क्ड' रिफंड पॉलिसी

कंपनीने एक्सवर पोस्ट करत सांगितले की, या काळात तिकीट बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी आता प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. इंडिगोने परताव्याची तारीख ४८ तास मागे घेतली आहे. पूर्वी ही घोषणा ५ डिसेंबरपासूनच्या तिकिटांसाठी होती, ती आता ३ डिसेंबरपासून रद्द झालेल्या विमानांना लागू करण्यात आली आहे. यावरून या संकटाची व्याप्ती किती मोठी होती, हे स्पष्ट होते.

नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोने आतापर्यंत सुमारे ९.५ लाख तिकिटांचे परतावे (सुमारे ८२७ कोटी रुपये) केले आहेत. यापैकी ६ लाख तिकिटे (५६९ कोटी रुपये) १ ते ७ डिसेंबर दरम्यानच्या विमानांची होती, जेव्हा हे संकट सर्वाधिक गंभीर होते.

संकट आले कशामुळे?

इंडिगोच्या अचानक मोठ्या प्रमाणात विमाने रद्द करण्याच्या संकटाचे मूळ नवीन फ्लाईट सेफ्टी नियमांमध्ये आहे, जे सरकारने सुमारे दोन वर्षांपूर्वी पायलटचा थकवा कमी करण्यासाठी जारी केले होते. या नियमांमुळे पायलटना जास्त विश्रांतीचा वेळ अनिवार्य करण्यात आला. यामुळे दररोज २२०० उड्डाणे घेणारी आणि कमी 'डाउनटाइम'वर भर देणाऱ्या इंडिगोला हे नवीन नियम लागू होताच पायलटची तीव्र कमतरता जाणवू लागली. यामुळे शेकडो विमाने रद्द करण्याची वेळ आली.

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून नागरी उड्डयन महासंचालनालयाने तात्पुरत्या स्वरूपात काही नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रलंबित रिफंड त्वरित क्लिअर करण्याचे आणि प्रभावित झालेल्या प्रवाशांकडून शुल्क न घेण्याचे निर्देश दिले होते. उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी तर इंडिगोवर कठोर कारवाई केली जाईल, जेणेकरून भविष्यात इतरांसाठी एक उदाहरण निर्माण होईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, या संकटानंतर विरोधी पक्षांनी देशातील विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांचे वर्चस्व असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, सरकारने हा मुक्त बाजार असून, नवीन एअरलाइन्सच्या प्रवेशाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo to Refund 100% for Cancelled Flights Between Dec 3-15

Web Summary : Indigo will refund tickets for flights cancelled between Dec 3-15, waiving cancellation fees. The airline has already refunded ₹827 crore, including ₹569 crore for Dec 1-7 flights. Pilot shortages due to new regulations caused cancellations. The government instructed Indigo to clear refunds and warned of strict action.
टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान