शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

भारताची एकता देशाच्या शत्रूंना बोचते; आपण सर्वांनी खंबीरपणे उभे रहायला हवे- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 07:31 IST

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तेव्हा ते बोलत होते.

केवडिया : गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडातही भारताची एकता देशाच्या शत्रूंना बोचते. भारताचे शत्रू देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांविरुद्ध देशाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तेव्हा ते बोलत होते. मोदी म्हणाले की, देशाच्या शत्रूंनी भारताचे विभाजन करण्यासाठी सर्वकाही केले. तरीही आपण त्यावर मात करू शकलो, कारण एकतेचे अमृत आपल्यात जिवंत होते. आपण आजही खूप सावध राहायला हवे. भूतकाळात ज्या शक्तींनी भारताला त्रास दिला, त्या आजही आहेत. आजही त्या आपल्यात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आपण खंबीर रहायला हवे, असे मोदी यावेळी म्हणाले. 

मी कर्तव्याच्या मार्गावर

मी एकता नगरमध्ये असलो तरी मनाने मोरबीतील पीडितांसोबत आहे. एका बाजूला वेदनामय हृदय आणि दुसऱ्या बाजूला कर्म व कर्तव्याचा मार्ग. या कर्तव्यपथाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. पण माझे अंतःकरण त्या शोकाकूल कुटुंबांसोबत आहे, असे ते म्हणाले.

आजचा भारत पटेलांसारख्या नेत्यांमुळे

सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी भारताच्या एकात्मतेचे नेतृत्व केले नसते तर परिस्थितीची कल्पना करणेही कठीण आहे. पाचशेहून अधिक संस्थानं एकत्र झाली नसती तर? आज आपण जो भारत पाहतो आहोत, त्याची कल्पनाही करता आली नसती. हे अवघड, अशक्य काम फक्त आणि फक्त सरदार पटेलांनीच पार पाडलं, असे पंतप्रधान यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात