शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

भारताची एकता देशाच्या शत्रूंना बोचते; आपण सर्वांनी खंबीरपणे उभे रहायला हवे- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 07:31 IST

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तेव्हा ते बोलत होते.

केवडिया : गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडातही भारताची एकता देशाच्या शत्रूंना बोचते. भारताचे शत्रू देशाची एकता तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रयत्नांविरुद्ध देशाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले.

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. तेव्हा ते बोलत होते. मोदी म्हणाले की, देशाच्या शत्रूंनी भारताचे विभाजन करण्यासाठी सर्वकाही केले. तरीही आपण त्यावर मात करू शकलो, कारण एकतेचे अमृत आपल्यात जिवंत होते. आपण आजही खूप सावध राहायला हवे. भूतकाळात ज्या शक्तींनी भारताला त्रास दिला, त्या आजही आहेत. आजही त्या आपल्यात फूट पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आपण खंबीर रहायला हवे, असे मोदी यावेळी म्हणाले. 

मी कर्तव्याच्या मार्गावर

मी एकता नगरमध्ये असलो तरी मनाने मोरबीतील पीडितांसोबत आहे. एका बाजूला वेदनामय हृदय आणि दुसऱ्या बाजूला कर्म व कर्तव्याचा मार्ग. या कर्तव्यपथाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. पण माझे अंतःकरण त्या शोकाकूल कुटुंबांसोबत आहे, असे ते म्हणाले.

आजचा भारत पटेलांसारख्या नेत्यांमुळे

सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी भारताच्या एकात्मतेचे नेतृत्व केले नसते तर परिस्थितीची कल्पना करणेही कठीण आहे. पाचशेहून अधिक संस्थानं एकत्र झाली नसती तर? आज आपण जो भारत पाहतो आहोत, त्याची कल्पनाही करता आली नसती. हे अवघड, अशक्य काम फक्त आणि फक्त सरदार पटेलांनीच पार पाडलं, असे पंतप्रधान यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात