शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

तीन वर्षात भारताचा तिसरा सर्जिकल स्ट्राइक, जाणून घ्या आधीच्या दोन सर्जिकल स्ट्राइकबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 15:37 IST

भारतीय सैन्यानं आज पहाटे सर्जिकल सर्जिकल  केल्याची माहिती असून, हा गेल्या तीन वर्षातला तिसरा स्ट्राइक आहे. गेल्या वर्षी..

नवी दिल्ली - भारतीय सैन्यानं आज पहाटे सर्जिकल सर्जिकल  केल्याची माहिती असून, हा गेल्या तीन वर्षातला तिसरा स्ट्राइक आहे. गेल्या वर्षी उरी हल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून 40 ते 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याआधी 2105मध्येही भारतीय जवानांनी म्यानमार सीमेवर सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. आज पुन्हा एकदा भारतीय जवानांनी अशीच कामगिरी केली आहे. म्यानमारमध्ये शिरून नागा दहशतवाद्यांच्या कॅंम्पवर भारतीय लष्कराने हे सर्जिकल स्ट्राइक केल्याचं वृत्त आहे. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा या आधीच्या दोन सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती...

 

भारतीय लष्कराने घेतला 'उरी'चा बदला

गेल्यावर्षी उरीमधील भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 19 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अखेर दहा दिवसांनी भारतीय जवानांनी 28 सप्टेंबर 2016 रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई करत 40 ते 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. 

लष्कराच्या दोन तुकड्यांमधील एकूण 7 प्लाटूननी हल्ल्यात सहभाग घेतला होता, कारण एकूण 7 लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त करायचे होते. प्रत्येक प्लाटूनमध्ये 15 ते 20 कमांडो होते. नियंत्रण रेषेवर आधीपासूनच डोग्रा आणि बिहार रेजिमेंटचे कमांडो होते. स्पेशल फोर्सच्या कमांडोचे सात प्लाटून नियंत्रण रेषेवर पोहोचल्यानंतर डोग्रा आणि बिहार रेजिमेंटच्या कमांडोंनी सीमेपलीकडे तोफांद्वारे हल्ला सुरु केला. कमांडोंकडे कर्ल-गुस्तोव रायफल्स होत्या, ज्या ग्रेनेड लॉन्चरसारख्या असतात. त्याचसोबत ज्वलनशील केमिकलही भारतीय जवानांकडे होते. प्रत्येक टीमकडे ड्रोन कॅमेरे होते आणि नाईट व्हिजन कॅमेरेही होते. ज्यांद्वारे काळोखातील चित्र स्पष्ट दिसण्यास मदत होत होती.

 

म्यानमारमध्ये घुसून एनएससीए-के च्या दहशतवाद्यांना लक्ष्य -

4 जून 2015 रोजी मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात एनएससीए-के या संघटनेच्या अतिरेक्यांनी डोग्रा रेजिमेंटच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आठवडयाभराच्या आतच 10 जूनला भारताच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी म्यानमारमध्ये घुसून  एनएससीए-के च्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते. यात मोठया प्रमाणावर एनएससीए-के चे दहशतवादी मारले गेले होते. 100 पेक्षा जास्त दहशतवादी या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मारले गेले होते. 

 

काय असते सर्जिकल स्ट्राइक - 

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे अतिशय गोपनीय पद्धतीने दुसऱ्या देशात घुसून लष्करी कारवाई करणे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असे ऑपरेशन राबवले होते. तसेच भारतानेही यापूर्वी पाकिस्तान व म्यानमारमध्ये असे ऑपरेशन राबवून दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी भारत पुन्हा सर्जिकस स्ट्राइक करू शकतो असा इशारा पाकिस्तानला दिला होता.

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndian Armyभारतीय जवानMyanmarम्यानमार