शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपासाठी ‘इंडिया’चा रनर अप फॉर्म्युला, काँग्रेस की प्रादेशिक पक्ष, कुणाचा फायदा, कुणाचं नुकसान? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 16:51 IST

India Alliance: २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांचा आधार बनवण्यात येण्याची तयारी आहे. जागा वाटपासाठी २०१९ च्या निकालानुसार रनरअप फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काँग्रेस आणि बहुतांश विरोधी पक्षांची गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचे संयोजक आणि जागावाटपाबाबत चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार समोर आले आहे. तसेच राज्यपातळीवरही वर्चस्व राखण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. तसेच इंडिया आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत अंदाज लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांनी ४५० जागांची निश्चिती केली आहे जिथे संयुक्त उमेदवार उतरवण्याची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये ओदिशा, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधील जागांचा समावेश करण्यात आलेला नाही. या तिन्ही राज्यांमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या बीजेडी, बीआरएस, वायएसआर काँग्रेस हे कुठल्याही आघाडीत सहभागी झालेले नाही.

विरोधी पक्षांच्या आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र विरोधी पक्षांकडून ४५० जागांवर संयुक्त उमेदवार उतरवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जागावाटपाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यासाठी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांचा आधार बनवण्यात येण्याची तयारी आहे. जागा वाटपासाठी २०१९ च्या निकालानुसार रनरअप फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षांनी ज्या जागा जिंकल्या असतील त्या त्यांनाच मिळतील. त्याबरोबरच जे पक्ष ज्या जागांवर दुसऱ्या स्थानी असतील त्यांना त्या जागा दिल्या जातील.

आता हा फॉर्म्युला मान्य झाल्यास कुणाला किती जागा मिळतील असा प्रश्न समोर आला आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार २०१९ च्या कामगिरीच्या आधारावर काँग्रेसला २६१ जागा मिळू शकतात. २०१९ मध्ये काँग्रेसने ४२२ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यात काँग्रेसला ५२ जागांवर विजय मिळाला होता. तर २०९ जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तर ९९ जागांवर पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे वरील फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २६१ जागा मिळतील. 

महाराष्ट्राचा विचार केल्यास त्या निवडणुकीत शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर ३ जागांवर पक्ष दुसऱ्या स्थानी होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५ जागा जिंकल्या होत्या तर १५ जागांवर ते दुसऱ्या स्थानी होते. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला २१ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४१ जागा मिळतील. उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाला ३६ जागा मिळू शकतात. बिहारमध्ये जेडीयूला १७ तर आरजेडीला १९ जागा मिळू शकतात. तामिळनाडूमध्ये डीएमकेला २३, सीपीआय(एम) ला १६, सीपीआयला ६, आप, रालोद, आययूएमएल, नॅशनल कॉन्फ्रन्स यांना प्रत्येकी ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. सीपीआय एमएलला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या फॉर्म्युल्यानुसार महबुबा मुफ्ती यांना एकही जागा मिळणार नाही.

रनरअप फॉर्म्युला हा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चांगला पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आकड्यांचा विचार केल्याच यामध्ये अनेक अडथळे आहेत. त्यावर सहमती बनणेही कठीण आहे. इंडिया आघाडीची स्थापना होण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसने २०० जागा लढवाव्यात, असा सल्ला दिला होता. रनरअप फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २६१ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसला बंगालमध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. आपची दिल्ली आणि पंजाबमध्ये निर्विवाद सत्ता आहे. मात्र येथील २० पैकी केवळ ३ जागाच त्यांच्या खात्यात जातील. तर एकेकाळी डाव्या पक्षांचा बालेकिल्ला राहिलेल्या डाव्या पक्षांना बंगालमध्ये एकही जागा मिळणार नाही. मात्र ममता बॅनर्जींसाठी हा फॉर्म्युलासुद्धा फायदेशीर आहे. या फॉर्म्युल्यानुसार महाराष्ट्रा बहुतांश जागा ठाकरे गट आणि पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या फॉर्म्युल्यावर सर्वपक्षीयांचं कसं एकमत होईल, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.  

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९