शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

घातक कोरोनाचा धोका भारतालाही; चीनची विमानसेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:25 IST

चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांची यादी साऊथहॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली आहे.

नवी दिल्ली : अत्यंत घातक कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांत भारताचाही समावेश आहे. कोरोनाने माजविलेला हाहाकार लक्षात घेऊन एअर इंडिया व इंडिगोसह सर्व भारतीय विमान कंपन्यांनी चीनशी विमानांची सेवा १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या ३० देशांची यादी साऊथहॅम्प्टन विद्यापीठातील संशोधकांनी तयार केली आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका सर्वप्रथम थायलंड, जपान, हाँगकाँगला आहे. या यादीत अमेरिका सहाव्या व भारत २३ व्या क्रमांकावर आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा ज्या शहरांना सर्वाधिक धोका आहे त्यामध्ये बँकॉक, हाँगकाँग व तैवानमधील ताईपेईचा समावेश आहे. चीनमध्ये बीजिंग, गुआंगझोऊ, शांघाय, चोंगकिंग यासह १८ शहरांत या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. कोरोनाची सुरुवात चीनमधील ज्या वुहान शहरातून झाली, तेथील सुमारे ५० लाख लोकांनी स्थलांतर केले आहे.इंडिगो एअरलाइन्सने बंगळुरू-हाँगकाँग मार्गावरील विमानसेवा १ फेब्रुवारीपासून तर दिल्ली ते चेंगडू मार्गावरील विमानसेवा १ ते २० फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहे. मात्र कोलकाता ते गुआंगझोऊ दरम्यानची विमानसेवा इंडिगो सुरूच ठेवणार आहे. एअर इंडियाने दिल्ली-शांघाय मार्गावरील विमानसेवा ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.चीनमध्ये १३२ जणांचा बळीकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये आतापर्यंत १३२ जण मरण पावले असून, या विषाणूची ६ हजारांहून अधिक लोकांना लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. येत्या दहा दिवसांत संसर्गाचे प्रमाण आणखी वाढणार असून, त्यामुळे बळींची संख्याही वाढण्याची भीती आहे.विषाणूची लागण झालेल्यांपैकी १२३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याशिवाय ९२३९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या पण उपचारानंतर संपूर्ण बरे झालेल्या १०३ जणांना रुग्णालयांतून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना