शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली - विदेशमंत्री एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:45 IST

देशाचे श्रेष्ठत्व बहुतांश भारतीयांनी केले मान्य

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढल्याचे बहुतांश भारतीयांनी मान्य केले आहे व सलग दुसऱ्यांदा मोदी सरकारला मिळालेल्या यशात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारतीय उद्योग महासंघ व अनंत सेंटरने आयोजित केलेल्या ‘द ग्रोथ नेट समिट ७.०’ या परिसंवादात ते बोलत होते. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात ते म्हणाले की, जागतिक संतुलन आकाराला येत असून, चीनची प्रगती तसेच काही मर्यादेपर्यंत भारताची प्रगती हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे, हे बहुतांश भारतीय लोकांनी मान्य केले आहे. सरकारने भारतात परिवर्तनाची शक्यता जिवंत ठेवण्याबरोबरच ती मजबूतही केली आहे, असेही ते म्हणाले.२०१५-२०१८ या कालावधीत विदेश सचिवपदावर काम केलेले जयशंकर यांनी म्हटले आहे की, सरकार देशांतर्गत तुलनेपेक्षा बाहेरून वेगळी दिसते. भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बाहेरील अर्थव्यवस्थांकडे सरकत आहे. भारतीय कंपन्या विदेशी बाजारपेठांपर्यंत योग्यरीत्या पोहोचण्यासाठी भारतीय विदेशी धोरणाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

सरकारी खात्यांमध्ये अधिक ताळमेळ राखण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे भारतीय कंपन्या विशेषत: विदेशी बाजारपेठांतील भारतीय कंपन्यांना ज्या आर्थिक मुद्यांवर संघर्ष करावा लागतो, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शेजारी देशांशी असलेल्या संबंधाचा विशेष उल्लेख करून जयशंकर म्हणाले की, सार्कऐवजी आता बिमस्टेकवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सोशल मीडियाची मोहीम सुरूच ठेवूविदेशांमध्ये भारतीयांची मदत करण्यासाठी त्यांच्या पूर्वासुरी सुषमा स्वराज यांच्या सोशल मीडियाच्या मोहिमेला पुढे चालूच ठेवू, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. विदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाईल व आता सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचेल, अशी ते अपेक्षा करू शकतात. यामुळे विदेशी मंत्रालयाची प्रतिमाच बदलली आहे.

टॅग्स :Indiaभारत