शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली - विदेशमंत्री एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:45 IST

देशाचे श्रेष्ठत्व बहुतांश भारतीयांनी केले मान्य

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढल्याचे बहुतांश भारतीयांनी मान्य केले आहे व सलग दुसऱ्यांदा मोदी सरकारला मिळालेल्या यशात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारतीय उद्योग महासंघ व अनंत सेंटरने आयोजित केलेल्या ‘द ग्रोथ नेट समिट ७.०’ या परिसंवादात ते बोलत होते. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात ते म्हणाले की, जागतिक संतुलन आकाराला येत असून, चीनची प्रगती तसेच काही मर्यादेपर्यंत भारताची प्रगती हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे, हे बहुतांश भारतीय लोकांनी मान्य केले आहे. सरकारने भारतात परिवर्तनाची शक्यता जिवंत ठेवण्याबरोबरच ती मजबूतही केली आहे, असेही ते म्हणाले.२०१५-२०१८ या कालावधीत विदेश सचिवपदावर काम केलेले जयशंकर यांनी म्हटले आहे की, सरकार देशांतर्गत तुलनेपेक्षा बाहेरून वेगळी दिसते. भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बाहेरील अर्थव्यवस्थांकडे सरकत आहे. भारतीय कंपन्या विदेशी बाजारपेठांपर्यंत योग्यरीत्या पोहोचण्यासाठी भारतीय विदेशी धोरणाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

सरकारी खात्यांमध्ये अधिक ताळमेळ राखण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे भारतीय कंपन्या विशेषत: विदेशी बाजारपेठांतील भारतीय कंपन्यांना ज्या आर्थिक मुद्यांवर संघर्ष करावा लागतो, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शेजारी देशांशी असलेल्या संबंधाचा विशेष उल्लेख करून जयशंकर म्हणाले की, सार्कऐवजी आता बिमस्टेकवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सोशल मीडियाची मोहीम सुरूच ठेवूविदेशांमध्ये भारतीयांची मदत करण्यासाठी त्यांच्या पूर्वासुरी सुषमा स्वराज यांच्या सोशल मीडियाच्या मोहिमेला पुढे चालूच ठेवू, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. विदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाईल व आता सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचेल, अशी ते अपेक्षा करू शकतात. यामुळे विदेशी मंत्रालयाची प्रतिमाच बदलली आहे.

टॅग्स :Indiaभारत