शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली - विदेशमंत्री एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 02:45 IST

देशाचे श्रेष्ठत्व बहुतांश भारतीयांनी केले मान्य

नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढल्याचे बहुतांश भारतीयांनी मान्य केले आहे व सलग दुसऱ्यांदा मोदी सरकारला मिळालेल्या यशात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारतीय उद्योग महासंघ व अनंत सेंटरने आयोजित केलेल्या ‘द ग्रोथ नेट समिट ७.०’ या परिसंवादात ते बोलत होते. मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात ते म्हणाले की, जागतिक संतुलन आकाराला येत असून, चीनची प्रगती तसेच काही मर्यादेपर्यंत भारताची प्रगती हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. मागील पाच वर्षांत भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे, हे बहुतांश भारतीय लोकांनी मान्य केले आहे. सरकारने भारतात परिवर्तनाची शक्यता जिवंत ठेवण्याबरोबरच ती मजबूतही केली आहे, असेही ते म्हणाले.२०१५-२०१८ या कालावधीत विदेश सचिवपदावर काम केलेले जयशंकर यांनी म्हटले आहे की, सरकार देशांतर्गत तुलनेपेक्षा बाहेरून वेगळी दिसते. भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बाहेरील अर्थव्यवस्थांकडे सरकत आहे. भारतीय कंपन्या विदेशी बाजारपेठांपर्यंत योग्यरीत्या पोहोचण्यासाठी भारतीय विदेशी धोरणाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

सरकारी खात्यांमध्ये अधिक ताळमेळ राखण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे भारतीय कंपन्या विशेषत: विदेशी बाजारपेठांतील भारतीय कंपन्यांना ज्या आर्थिक मुद्यांवर संघर्ष करावा लागतो, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शेजारी देशांशी असलेल्या संबंधाचा विशेष उल्लेख करून जयशंकर म्हणाले की, सार्कऐवजी आता बिमस्टेकवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

सोशल मीडियाची मोहीम सुरूच ठेवूविदेशांमध्ये भारतीयांची मदत करण्यासाठी त्यांच्या पूर्वासुरी सुषमा स्वराज यांच्या सोशल मीडियाच्या मोहिमेला पुढे चालूच ठेवू, असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. विदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाईल व आता सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचेल, अशी ते अपेक्षा करू शकतात. यामुळे विदेशी मंत्रालयाची प्रतिमाच बदलली आहे.

टॅग्स :Indiaभारत