शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

Coronavirus: ७ मेनंतर भारतात पहिल्यांदाच घडलं, ‘R’ रेटनं टेन्शन वाढलं; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:59 IST

महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल.

ठळक मुद्देभारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झालाR वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावीजर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर

नवी दिल्ली – भारतात ७ मे नंतर पहिल्यांदाच कोरोना व्हायरस(SARS COV 2) ची R वॅल्यू १ च्या पलीकडे गेली आहे. याबाबत माहिती इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स चेन्नईच्या स्टडीतून समोर आली आहे. R0 अथवा R हा असा फॅक्टर आहे जो कोरोना संक्रमित एक व्यक्तीपासून किती लोकांना संक्रमण पोहचवू शकतो याचा अंदाज देतो. देशात काही राज्यांना कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं समोर येत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स कम्प्यूटेशनल विज्ञान आणि थियोरेटिकल फिजिक्सचे प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, २७ जुलैनंतर भारतात ‘R’ १ पार केले आहे. ७ मेनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे जेव्हा कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपुष्टात आली होती. २७ ते ३१ जुलैमध्ये R वॅल्यू १.०३ इतकी होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या भारतात R वॅल्यू १ च्या आसपास पोहचल्याची माहिती दिली आहे.

१ च्या खाली मूल्यांकन चांगले

महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल. कारण ही महामारी कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकत नाही. R वॅल्यूचा अर्थ एक कोरोना संक्रमित व्यक्ती सरासरी कमीत कमी एक व्यक्ती संक्रमित करू शकतो. तर १ पेक्षा कमी वॅल्यूचा अर्थ कोरोना संक्रमित व्यक्ती एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतो.

याराज्यात R वॅल्यू चिंतेचा विषय

भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा वगळता बहुतांश पूर्वोत्तर राज्यात R वॅल्यू १ पेक्षा अधिक आहे. विशेषत: केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश याठिकाणी वाढणाऱ्या सक्रीय रुग्णांमुळे डोकेदुखी वाढली आहे. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशात R वॅल्यू १ च्या आसपास आहे.

तिसऱ्या लाटेची संभावना असताना धोका वाढला?

भारतात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता R वॅल्यूमुळे धोका वाढला का यावर प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, R वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावी. जर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धोक्याचे संकेत आहेत असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत