शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Coronavirus: ७ मेनंतर भारतात पहिल्यांदाच घडलं, ‘R’ रेटनं टेन्शन वाढलं; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:59 IST

महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल.

ठळक मुद्देभारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झालाR वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावीजर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर

नवी दिल्ली – भारतात ७ मे नंतर पहिल्यांदाच कोरोना व्हायरस(SARS COV 2) ची R वॅल्यू १ च्या पलीकडे गेली आहे. याबाबत माहिती इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स चेन्नईच्या स्टडीतून समोर आली आहे. R0 अथवा R हा असा फॅक्टर आहे जो कोरोना संक्रमित एक व्यक्तीपासून किती लोकांना संक्रमण पोहचवू शकतो याचा अंदाज देतो. देशात काही राज्यांना कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचं समोर येत आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमेटिकल सायन्स कम्प्यूटेशनल विज्ञान आणि थियोरेटिकल फिजिक्सचे प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, २७ जुलैनंतर भारतात ‘R’ १ पार केले आहे. ७ मेनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे जेव्हा कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपुष्टात आली होती. २७ ते ३१ जुलैमध्ये R वॅल्यू १.०३ इतकी होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या भारतात R वॅल्यू १ च्या आसपास पोहचल्याची माहिती दिली आहे.

१ च्या खाली मूल्यांकन चांगले

महामारीच्या काळात आरोग्य प्राधिकरण वारंवार R मूल्यांकन १ च्या खाली जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा व्हायरस पसरणं बंद होईल. कारण ही महामारी कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करू शकत नाही. R वॅल्यूचा अर्थ एक कोरोना संक्रमित व्यक्ती सरासरी कमीत कमी एक व्यक्ती संक्रमित करू शकतो. तर १ पेक्षा कमी वॅल्यूचा अर्थ कोरोना संक्रमित व्यक्ती एकाच व्यक्तीला संक्रमित करू शकतो.

याराज्यात R वॅल्यू चिंतेचा विषय

भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे ४० हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर ४२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा वगळता बहुतांश पूर्वोत्तर राज्यात R वॅल्यू १ पेक्षा अधिक आहे. विशेषत: केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश याठिकाणी वाढणाऱ्या सक्रीय रुग्णांमुळे डोकेदुखी वाढली आहे. तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशात R वॅल्यू १ च्या आसपास आहे.

तिसऱ्या लाटेची संभावना असताना धोका वाढला?

भारतात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता R वॅल्यूमुळे धोका वाढला का यावर प्रोफेसर सीताभरा सिन्हा म्हणाले की, R वॅल्यू १ पेक्षा जास्त असणं तात्पुरतं असावं आणि काही दिवसांनी पुन्हा R वॅल्यू १ पेक्षा खाली यावी. जर देशातील अनेक राज्यात एकाच वेळी R वॅल्यू १ पेक्षा अधिक झाल्यास सक्रीय रुग्णांच्या संख्येत भर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे धोक्याचे संकेत आहेत असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत