शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आता अरुणाचल प्रदेशमध्ये तणाव?; भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 18:40 IST

भारतीय लष्कर अतिक्रमण करत असल्याचा चीनचा दावा

डोक्लामनंतर आता अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील आसफिला क्षेत्रात भारतीय सैन्य देत असलेल्या पहाऱ्याला चीनने आक्षेप घेतला आहे. भारतीय सैन्याकडून घातली जाणारी गस्त म्हणजे अतिक्रमण आहे, असे चीनने म्हटले आहे. मात्र भारताने चीनचा आक्षेप धुडकावून लावला आहे. 15 मार्चला भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत चीनने भारताकडून अरुणाचल प्रदेशातील आसफिला क्षेत्रात सुरु असलेल्या पेट्रोलिंगला आक्षेप घेतला. मात्र चीनचा हा आक्षेप भारताने खोडून काढला. आसफिला परिसर अरुणाचल प्रदेशच्या सुबानसिरी जिल्ह्यात येतो. भारतीय लष्कराकडून या भागात नियमित गस्त घातली जाते. या भागातील भारतीय सैन्याचा पहारा म्हणजे अतिक्रमण असल्याचे चिनी सैन्याने म्हटले होते. मात्र भारताने यावर आक्षेप घेतला, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 'आफसिला परिसरात दिल्या जाणाऱ्या पहाऱ्याचा चीनकडून होणारा विरोध अतिशय आश्चर्यजनक आहे,' असे एका भारतीय अधिकाऱ्याने म्हटले. या भागात चीनकडून अनेकदा घुसखोरी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष सीमारेषेबद्दल भारत आणि चीनमध्ये वाद आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांग प्रदेशाच्या मोठ्या भूभागावर चीनने अनेकदा दावा सांगितला आहे. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत चीनने अतिशय आक्रमकपणे आसफिला क्षेत्रातील भारतीय लष्कराच्या गस्तीचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय लष्कराच्या अशा कृतीमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढेल, असा सूचक इशाराही चीनकडून देण्यात आला. मात्र चीनचा हा आक्षेप भारतानेही आक्रमकपणे खोडून काढला. भारतीय लष्कर या भागातील गस्त कायम ठेवेल, अशा स्पष्ट शब्दांमध्ये चीनला भारतीय अधिकाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.  

टॅग्स :chinaचीनArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशDoklamडोकलाम