शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारतात उत्तर कोरिया, बांगलादेशपेक्षा भूकेची स्थिती वाईट, 119 देशांमध्ये भारत 100 व्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 09:17 IST

भारतात राजकारणी विकासाचे दावे करत असले तरी, देशात उपाशीपोटी झोपणा-यांची संख्या कमी नाही. देशात भूकेची समस्या गंभीर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

ठळक मुद्देलहान मुलांचे कुपोषण, बाल मृत्यू दर, मुलांच्या विकासात अडथळे हे मुद्दे विचारात घेऊन भूक निर्देशांक काढला जातो. संपूर्ण आशियामध्ये फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या मागे आहेत. 

नवी दिल्ली - भारतात राजकारणी विकासाचे दावे करत असले तरी, देशात उपाशीपोटी झोपणा-यांची संख्या कमी नाही. देशात भूकेची समस्या गंभीर असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 119 विकसनशील देशांचा जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्चने प्रसिद्ध केला आहे. या यादीमध्ये भारत 100 व्या स्थानी आहे. भारत उत्तर कोरिया, बांगलादेश आणि इराकसारख्या देशांपेक्षाही मागे आहे तर, पाकिस्तानपेक्षा पुढे आहे.  

मागच्यावर्षी भारत 97 व्या स्थानी होता. लहान मुलांचे कुपोषण, बाल मृत्यू दर, मुलांच्या विकासात अडथळे हे मुद्दे विचारात घेऊन भूक निर्देशांक काढला जातो. या समस्येवर मात करण्यासाठी सामाजिक क्षेत्राने कटिबद्धता दाखवणे आवश्यक आहे असे  इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे. 119 देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानी असून संपूर्ण आशियामध्ये फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारताच्या पुढे आहेत. 

31.4 सह भारत 2017 सालच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये गंभीर श्रेणीमध्ये आहे. या यादीच चीन 29, नेपाळ 72, म्यानमार 77, श्रीलंका 84, बांगलादेश 88 व्या स्थानावर आहेत. पाकिस्तान 106 तर, अफगाणिस्तान 107 क्रमांकावर आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये तुमच्या क्रमवारीत घसरण झाली तर, त्याचा अर्थ तुमच्या देशात भूकेची समस्या गंभीर आहे असा निघतो आणि क्रमवारीत वरच्या स्थानावर असाल तर, तुमच्याकडे परिस्थिती चांगली आहे. भारतापेक्षा श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या तुलनेने गरीब असलेल्या देशात आज चांगली स्थिती आहे. 

टॅग्स :foodअन्न