शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अमरावती ते विजयवाडा फक्त पाच मिनिटांमध्ये भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:16 IST

आंध्रप्रदेशच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारत असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपने जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देइतर राज्यांमध्ये आता कोठे मेट्रो प्रकल्पाची पहाट होत असताना आंध्र प्रदेशाने इतर राज्यांना मागे टाकत अशी झेप घेतली आहे.

मुंबई, दि ७- आंध्रप्रदेशच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारत असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपने जोडली जाणार आहेत. सर्वात गतिमान वाहतूक करणा-या या सेवेमुळे दोन्ही शहरांमध्ये केवळ पाच मिनिटांचे अंतर राहणार आहे. नवी राजधानी सर्व आधुनिक सेवांनी आणि सोयींनी युक्त असावी असा मानस असणा-या आंध्र सरकारने नुकताच यासाठी अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. 

जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारतातील तो पहिला हायपरलूप प्रकल्प मानला जाईल. देशातील इतर राज्यांमध्ये आता कोठे मेट्रो प्रकल्पाची पहाट होत असताना आंध्र प्रदेशाने इतर राज्यांना मागे टाकत अशी झेप घेतली आहे. हायपरलूपची संकल्पना एलन मस्क यांनी सर्वप्रथम अमेरिकेत मांडली, मात्र आजवर ती कोठेही प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही. 

आंध्र प्रदेश राज्याचे आर्थिक विकास मंडळ आणि अमेरिकास्थित हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नाँलजी ( एचटीटी) यांच्यामध्ये झालेल्या करारात या हायपरलूप प्रकल्पाची निश्चिती करण्यात आली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, अजून याला किती खर्च येईल हे जाहीर करण्यात आलेले नाही.

हायपरलूप एखाद्या ट्यूबसारखे असून त्यामध्ये होणारी वाहतूक अत्यंत वेगाने होते, अनेक देशांमध्ये अजूनही ही व्यवस्था प्रयोगाच्या व चाचणीच्या पातळीवरच विकसित झालेली आहे. स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकाँनाँमिक फोरममध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एचटीटीच्या अधिका-यांशी यावर चर्चा केली नंतर त्याच्या सिद्धतेबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर एचटीटीचे अध्यक्ष बिशप गेस्टा आणि आंध्र आर्थिक विकास मंडळाचो मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण किशोर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याक आला.

या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पामुळे अमरावती आणि विजयवाडा हे ३५ किमीचे अंतर पाच मिनिटांमध्ये पार करता येईल. सहा महिन्यांच्या फिजिबिलिटी स्टडीनंतर प्रत्यक्ष प्रकल्पास सुरुवात होईल व भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प आम्ही बांधू असा विश्वास बिशप यांनी व्यक्त केला आहे.  एचटीटी आंध्र विकास मंडळ आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास डाईल असा विश्वास कृष्ण किशोर यांनी व्यक्त कोला आहे.