शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

अमरावती ते विजयवाडा फक्त पाच मिनिटांमध्ये भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:16 IST

आंध्रप्रदेशच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारत असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपने जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देइतर राज्यांमध्ये आता कोठे मेट्रो प्रकल्पाची पहाट होत असताना आंध्र प्रदेशाने इतर राज्यांना मागे टाकत अशी झेप घेतली आहे.

मुंबई, दि ७- आंध्रप्रदेशच्या किनारी प्रदेशात असणारे मोठे शहर विजयवाडा आणि सध्या वेगाने आकारत असणारी नवी राजधानी अमरावती आता हायपरलूपने जोडली जाणार आहेत. सर्वात गतिमान वाहतूक करणा-या या सेवेमुळे दोन्ही शहरांमध्ये केवळ पाच मिनिटांचे अंतर राहणार आहे. नवी राजधानी सर्व आधुनिक सेवांनी आणि सोयींनी युक्त असावी असा मानस असणा-या आंध्र सरकारने नुकताच यासाठी अमेरिकन कंपनीशी करार केला आहे. 

जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारतातील तो पहिला हायपरलूप प्रकल्प मानला जाईल. देशातील इतर राज्यांमध्ये आता कोठे मेट्रो प्रकल्पाची पहाट होत असताना आंध्र प्रदेशाने इतर राज्यांना मागे टाकत अशी झेप घेतली आहे. हायपरलूपची संकल्पना एलन मस्क यांनी सर्वप्रथम अमेरिकेत मांडली, मात्र आजवर ती कोठेही प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही. 

आंध्र प्रदेश राज्याचे आर्थिक विकास मंडळ आणि अमेरिकास्थित हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नाँलजी ( एचटीटी) यांच्यामध्ये झालेल्या करारात या हायपरलूप प्रकल्पाची निश्चिती करण्यात आली. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, अजून याला किती खर्च येईल हे जाहीर करण्यात आलेले नाही.

हायपरलूप एखाद्या ट्यूबसारखे असून त्यामध्ये होणारी वाहतूक अत्यंत वेगाने होते, अनेक देशांमध्ये अजूनही ही व्यवस्था प्रयोगाच्या व चाचणीच्या पातळीवरच विकसित झालेली आहे. स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड इकाँनाँमिक फोरममध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एचटीटीच्या अधिका-यांशी यावर चर्चा केली नंतर त्याच्या सिद्धतेबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर एचटीटीचे अध्यक्ष बिशप गेस्टा आणि आंध्र आर्थिक विकास मंडळाचो मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण किशोर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याक आला.

या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पामुळे अमरावती आणि विजयवाडा हे ३५ किमीचे अंतर पाच मिनिटांमध्ये पार करता येईल. सहा महिन्यांच्या फिजिबिलिटी स्टडीनंतर प्रत्यक्ष प्रकल्पास सुरुवात होईल व भारतातील पहिला हायपरलूप प्रकल्प आम्ही बांधू असा विश्वास बिशप यांनी व्यक्त केला आहे.  एचटीटी आंध्र विकास मंडळ आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास डाईल असा विश्वास कृष्ण किशोर यांनी व्यक्त कोला आहे.