शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मोदींच्या मनमानीमुळे देश आर्थिक संकटात, डॉ. मनमोहन सिंग यांची सडेतोड टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:59 IST

शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली.

बंगळुरु - शहाणपणाची मक्तेदारी फक्त आपल्याकडेच आहे, असा समज करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी धोरणे राबवून अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन केल्याने देशावर आर्थिक संकट ओढवले आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी येथे केली.कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने डॉ़ सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला. ते म्हणाले की, आमचे इरादे साफ असल्याचे मोदी सरकार सांगते, पण त्यांच्या निर्णयांना व धोरणांना तर्कसंगती नाही़ नेमके काय घडते, याचे विश्लेषण करण्याची तयारी नसल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे.डॉ. सिंग म्हणाले की, देश सध्या बिकट कालखंडातून जात आहे. शेतकरी संकटात आहेत, तरुण पिढीला नोकऱ्यांच्या संधी नाहीत आणि अर्थव्यवस्थेचा विकास क्षमतेहून कमी दराने होत आहे. हे टाळता येण्यासारखे होते तरी टाळले गेले नाही. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाण्याऐवजी चुका व त्रुटी दाखविणाºयांची तोंडे बंद करण्याची सरकारची वृत्ती आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांचा जनतेच्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सरकारने लहर व मर्जीनुसार काम न करता काळजीपूर्वक धोरणे राबविणे गरजेचे असते, अशी टीकाही डॉ़ सिंग यांनी केली़हे सरकार अर्थव्यवस्था जोमात असल्याचे फसवे चित्र रंगविते. ‘संपुआ’ सरकारच्या काळात जगभरात प्रतिकूल परिस्थिती असूनही विकासदर सरासरी ७ टक्के राहिला होता व एकदा तर तो ८ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. (वृत्तसंस्था)मोदींनी पातळी सोडलीमोदींनी पातळी सोडून प्रचार केल्याने पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेस कमीपणा आल्याची टीकाही डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. ते म्हणाले की, प्रचारात मोदी ज्या प्रकारची विधाने करीत आहेत, तशी आजवर कोणाही पंतप्रधानाने केलेली नाहीत. ते समाजाचे जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करू पाहात आहेत, पण याने कर्नाटकचे किंवा देशाचे भले होणार नाही. मोदी यावरून काही धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.शहाणपणाची मक्तेदारी तुमच्याकडेच नाही!सर्व शहाणपणाची मक्तेदारी एकट्या माझ्याकडे आहे, असे कोणी म्हणू शकत नाही. देशाचा घात करणाºया कोणत्याही धोरणाचा सरकारला जाब विचारल्यास उलट जाब विचारणाºयाचा हेतूच विखारी असल्याचे उत्तर मिळते.जनमत चाचणी : काँग्रेसला सर्वाधिक जागाजनता दल (सेक्युलर) ठरणार किंगमेकरकर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, पण त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, असा निष्कर्ष लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या जनमत चाचणीत निघाला आहे. जनता दल (सेक्युलर)च्या मदतीशिवाय कोणालाही सरकार बनविता येणार नाही, असेही या चाचणीत म्हटले आहे.२२५ पैकी किती जागाकाँग्रेस 97भाजपा 84जेडीएस 37 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी