शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी- अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:00 IST

२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची

नवी दिल्ली : भारत पाच टक्के आर्थिक मंदीला तोंड देत नसून जगात वेगाने वाढणारी अशी त्याची अर्थव्यवस्था आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.प्रश्न तासात ठाकूर म्हणाले की, उद्योगांना कर सवलती आणि बँकांचे विलीनीकरण यासह सरकारने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘पाच टक्के मंदी नाही. हा आकडा तुम्हाला मिळाला कोठून? आम्हाला दाखवा’, असे आव्हान ठाकूर यांनी आम आदमी पक्षाचे (आप) खासदार भगवंत मान यांनी देश आर्थिक मंदीला तोंड देत असल्याचे म्हटल्यावर दिले. ठाकूर म्हणाले की, जगात अनेक देश आर्थिक मंदीला तोंड देत असले तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची असेल. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली त्याचा विशेष उल्लेख करून ठाकूर म्हणाले की, उद्योगांना, विदेशी थेट गुंतवणूक आणि एमएसएमई सेक्टरला करांत सवलती दिल्या गेल्या आहेत. अनेक बँकांचे विलीनीकरण मोठ्या बँकांमध्ये करण्यात आले आहेत आणि सरकारचे अंतिम ध्येय हे मजबूत पाया असलेल्या चार बँका सक्रिय ठेवणे आणि आर्थिक उपक्रम कसे वाढतील, याची खात्री करणे हे आहे.काळ्या पैशांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली असून, वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर भरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे, असे ठाकूर म्हणाले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सकल देशी उत्पादन (जीडीपी) वाढीचा सरासरी दर हा २०१४-२०१९ कालावधीत ७.५ टक्के होता व हा दर जी-२० देशांमध्ये सर्वात जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था