शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी- अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:00 IST

२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची

नवी दिल्ली : भारत पाच टक्के आर्थिक मंदीला तोंड देत नसून जगात वेगाने वाढणारी अशी त्याची अर्थव्यवस्था आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.प्रश्न तासात ठाकूर म्हणाले की, उद्योगांना कर सवलती आणि बँकांचे विलीनीकरण यासह सरकारने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘पाच टक्के मंदी नाही. हा आकडा तुम्हाला मिळाला कोठून? आम्हाला दाखवा’, असे आव्हान ठाकूर यांनी आम आदमी पक्षाचे (आप) खासदार भगवंत मान यांनी देश आर्थिक मंदीला तोंड देत असल्याचे म्हटल्यावर दिले. ठाकूर म्हणाले की, जगात अनेक देश आर्थिक मंदीला तोंड देत असले तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची असेल. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली त्याचा विशेष उल्लेख करून ठाकूर म्हणाले की, उद्योगांना, विदेशी थेट गुंतवणूक आणि एमएसएमई सेक्टरला करांत सवलती दिल्या गेल्या आहेत. अनेक बँकांचे विलीनीकरण मोठ्या बँकांमध्ये करण्यात आले आहेत आणि सरकारचे अंतिम ध्येय हे मजबूत पाया असलेल्या चार बँका सक्रिय ठेवणे आणि आर्थिक उपक्रम कसे वाढतील, याची खात्री करणे हे आहे.काळ्या पैशांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली असून, वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर भरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे, असे ठाकूर म्हणाले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सकल देशी उत्पादन (जीडीपी) वाढीचा सरासरी दर हा २०१४-२०१९ कालावधीत ७.५ टक्के होता व हा दर जी-२० देशांमध्ये सर्वात जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था