शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी- अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:00 IST

२०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची

नवी दिल्ली : भारत पाच टक्के आर्थिक मंदीला तोंड देत नसून जगात वेगाने वाढणारी अशी त्याची अर्थव्यवस्था आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.प्रश्न तासात ठाकूर म्हणाले की, उद्योगांना कर सवलती आणि बँकांचे विलीनीकरण यासह सरकारने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘पाच टक्के मंदी नाही. हा आकडा तुम्हाला मिळाला कोठून? आम्हाला दाखवा’, असे आव्हान ठाकूर यांनी आम आदमी पक्षाचे (आप) खासदार भगवंत मान यांनी देश आर्थिक मंदीला तोंड देत असल्याचे म्हटल्यावर दिले. ठाकूर म्हणाले की, जगात अनेक देश आर्थिक मंदीला तोंड देत असले तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची असेल. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली त्याचा विशेष उल्लेख करून ठाकूर म्हणाले की, उद्योगांना, विदेशी थेट गुंतवणूक आणि एमएसएमई सेक्टरला करांत सवलती दिल्या गेल्या आहेत. अनेक बँकांचे विलीनीकरण मोठ्या बँकांमध्ये करण्यात आले आहेत आणि सरकारचे अंतिम ध्येय हे मजबूत पाया असलेल्या चार बँका सक्रिय ठेवणे आणि आर्थिक उपक्रम कसे वाढतील, याची खात्री करणे हे आहे.काळ्या पैशांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली असून, वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर भरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे, असे ठाकूर म्हणाले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सकल देशी उत्पादन (जीडीपी) वाढीचा सरासरी दर हा २०१४-२०१९ कालावधीत ७.५ टक्के होता व हा दर जी-२० देशांमध्ये सर्वात जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था