शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:56 IST

जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

भारतात २०२१ मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे. यानंतर तीन महिन्यांनी जनगणना सुरु केली जाऊ शकते. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

तारखा पुढे ढकलल्या...

नियमित शिरस्त्यानुसार घरांचे लिस्टिंग, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान होणे अपेक्षित होते. 

जनगणना याआधी कधी झाली नाही?

भारतात जनगणनेच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली आहे. १९४१ दुसऱ्या महायुद्धामुळे जनगणनेला उशिर झाला असला तरी सर्वेक्षणाचे काम वेळेवर पूर्ण करून माहितीचे संकलन केले होते. १९६१भारत-चीन युद्ध वेळीही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. १९७१ बांगलादेश निर्मिती वेळी पाकिस्तान सोबत युद्ध झाले. पण याही वर्षी जनगणना नीटपणे पूर्ण करण्यात आली.

जनगणना का गरजेची? 

पहिली जनगणना १८८१ साली झाली. नंतर दर १०-१० वर्षांनी जनगणना झाली. त्यामुळे दर १० वर्षांची तुलनात्मक माहिती विश्लेषणासह उपलब्ध आहे. २०२१ मात्र ती पार न पडल्याने पहिल्यांदा यात खंड पडणार आहे.याआधारे मागील वर्षांचे नेमके मूल्यमापन करणे, वर्तमानातील योजना अचूकपणे आखणे व भविष्याबाबत ठोकताळे बांधणे शक्य होते. ते आता जमणार नाही. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी, योजनांच्या अंमलबाजवणीसाठी कालबद्ध पद्धतीने जनगणना गरजेची आहे.

इतर देशांमध्ये जनगणनेचे काय झाले? 

मेरिकेत कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही २०२० मध्ये जनगणना करण्यात आली.इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडमध्ये ही कोरोना महामारी सुरु असताना विविध यंत्रणांनी ठरलेल्या वेळी माहिती जमवण्याचे काम सुरु केले.ज्या चीनमधून कोरोना जगभर पसरला तिथेही जनगणना ठरलेल्या वेळी पार पडली.

टॅग्स :Indiaभारत