शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:56 IST

जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

भारतात २०२१ मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे. यानंतर तीन महिन्यांनी जनगणना सुरु केली जाऊ शकते. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

तारखा पुढे ढकलल्या...

नियमित शिरस्त्यानुसार घरांचे लिस्टिंग, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान होणे अपेक्षित होते. 

जनगणना याआधी कधी झाली नाही?

भारतात जनगणनेच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली आहे. १९४१ दुसऱ्या महायुद्धामुळे जनगणनेला उशिर झाला असला तरी सर्वेक्षणाचे काम वेळेवर पूर्ण करून माहितीचे संकलन केले होते. १९६१भारत-चीन युद्ध वेळीही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. १९७१ बांगलादेश निर्मिती वेळी पाकिस्तान सोबत युद्ध झाले. पण याही वर्षी जनगणना नीटपणे पूर्ण करण्यात आली.

जनगणना का गरजेची? 

पहिली जनगणना १८८१ साली झाली. नंतर दर १०-१० वर्षांनी जनगणना झाली. त्यामुळे दर १० वर्षांची तुलनात्मक माहिती विश्लेषणासह उपलब्ध आहे. २०२१ मात्र ती पार न पडल्याने पहिल्यांदा यात खंड पडणार आहे.याआधारे मागील वर्षांचे नेमके मूल्यमापन करणे, वर्तमानातील योजना अचूकपणे आखणे व भविष्याबाबत ठोकताळे बांधणे शक्य होते. ते आता जमणार नाही. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी, योजनांच्या अंमलबाजवणीसाठी कालबद्ध पद्धतीने जनगणना गरजेची आहे.

इतर देशांमध्ये जनगणनेचे काय झाले? 

मेरिकेत कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही २०२० मध्ये जनगणना करण्यात आली.इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडमध्ये ही कोरोना महामारी सुरु असताना विविध यंत्रणांनी ठरलेल्या वेळी माहिती जमवण्याचे काम सुरु केले.ज्या चीनमधून कोरोना जगभर पसरला तिथेही जनगणना ठरलेल्या वेळी पार पडली.

टॅग्स :Indiaभारत