शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

२०२१चा मुहूर्त हुकला, जनगणना होणार कधी?; सीमा गोठवण्याचे काम पू्र्ण करा, सर्व राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:56 IST

जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

भारतात २०२१ मध्ये नियोजित असलेल्या जनगणनेची तारीख पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. रजिस्ट्रार आणि जनगणना कार्यालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून जनगणनेसाठी प्रशासकीय सीमा गोठविण्याचे काम ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे. यानंतर तीन महिन्यांनी जनगणना सुरु केली जाऊ शकते. त्यामुळे जनगणनेची प्रक्रिया २०२४ च्या आधी पूर्ण होणे कठीण आहे.

तारखा पुढे ढकलल्या...

नियमित शिरस्त्यानुसार घरांचे लिस्टिंग, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान होणे अपेक्षित होते. 

जनगणना याआधी कधी झाली नाही?

भारतात जनगणनेच्या १५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली आहे. १९४१ दुसऱ्या महायुद्धामुळे जनगणनेला उशिर झाला असला तरी सर्वेक्षणाचे काम वेळेवर पूर्ण करून माहितीचे संकलन केले होते. १९६१भारत-चीन युद्ध वेळीही जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. १९७१ बांगलादेश निर्मिती वेळी पाकिस्तान सोबत युद्ध झाले. पण याही वर्षी जनगणना नीटपणे पूर्ण करण्यात आली.

जनगणना का गरजेची? 

पहिली जनगणना १८८१ साली झाली. नंतर दर १०-१० वर्षांनी जनगणना झाली. त्यामुळे दर १० वर्षांची तुलनात्मक माहिती विश्लेषणासह उपलब्ध आहे. २०२१ मात्र ती पार न पडल्याने पहिल्यांदा यात खंड पडणार आहे.याआधारे मागील वर्षांचे नेमके मूल्यमापन करणे, वर्तमानातील योजना अचूकपणे आखणे व भविष्याबाबत ठोकताळे बांधणे शक्य होते. ते आता जमणार नाही. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी, योजनांच्या अंमलबाजवणीसाठी कालबद्ध पद्धतीने जनगणना गरजेची आहे.

इतर देशांमध्ये जनगणनेचे काय झाले? 

मेरिकेत कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही २०२० मध्ये जनगणना करण्यात आली.इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंडमध्ये ही कोरोना महामारी सुरु असताना विविध यंत्रणांनी ठरलेल्या वेळी माहिती जमवण्याचे काम सुरु केले.ज्या चीनमधून कोरोना जगभर पसरला तिथेही जनगणना ठरलेल्या वेळी पार पडली.

टॅग्स :Indiaभारत