शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

दलाई लामांना अरुणाचलमध्ये प्रवेश देणं भारताची मोठी चूक - चीन

By admin | Updated: April 1, 2017 12:03 IST

तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 1 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे. सीमारेषेवरील राज्यात दलाई लामांना प्रवेश देण चूक असल्याचं सांगत चीन भारताविरोधातील आपला राग व्यक्त करत आहे. 
 
"दलाई लामांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश दिल्याने द्विपक्षीय संबंधांवर याचा फरक पडेल", अशी धमकीचं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी दिली आहे. अरुणाचल प्रदेशात दलाई लामांनी कोणतीही हालचाल करणं चीनच्या पचनी पडत नसून त्यांनी वारंवार यासंबंधी भारताकडे आपला निषेध व्यक्त केला असल्याचंही ते बोलले आहेत.
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
(भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता)
 
भारताने दावा केलेल्या पाकिस्तानव्याप्त काश्मीरात चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरसाठी चीनकडून पायाभूत सुविधांचं बांधकाम सुरु असून चीनने या मुद्यावरुनही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरमुळे भारताच्या काश्मीर प्रश्नावर कोणताही प्रभाव पडणार नसून भारताला चिंता करण्याची गरज नाही असं चीनचं म्हणणं आहे. 
 
गेल्यावर्षीच धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली होती. भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन मात्र चिडण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे चीनने आपला राग व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्याही अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने याअगोदर विरोध केला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आक्षेपाला फेटाळलं होता. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं.
 
चीनने 2009 मध्येदेखील दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला विरोध केला होता. चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते. 
 
अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनमधील वादग्रस्त भाग असल्याने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा आपण विरोध करतो असं चीनने म्हटलं होतं. तवांग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वर्मा यांनी हा दौरा केला होता. 
चीनने अगोदरपासून अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून हा भारताचा भाग असल्याचं मानत नाही. राज्यातील 83,500 चौ.कि.मी परिसरावर चीनने दावा केलेला आहे.