शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेसाठी भारताचं मोठं पाऊल; अमित शाह यांनी समिती स्थापन केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:24 IST

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन जोरदार निदर्शने सुरू आहेत.

बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. पण, तरीही बांगलादेशातील गोंधळ थांबलेला नाही. आता बांगलादेशातील हिंदूंना लक्ष केले जात असल्याची माहिती समोर आली.  यावर आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घोषणा केली की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल.

कामाची बातमी! 'या' योजनेत गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकतात; योजनेबद्दल जाणून घ्या

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन माहिती दिली.  “बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील (IBB) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. ही समिती एडीजी, सीमा सुरक्षा दल, पूर्व कमांड यांच्या नेतृत्वाखाली असेल, असं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बांगलादेशातील भारतीय आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही समिती  भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम करते. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली आहे, आणि अवामी लीगशी संबंधित किमान दोन हिंदू नेते पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून भारतात गेले. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील हल्ल्यांच्या घटनांदरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते म्हणाले की, ते वांशिक कारणास्तव कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना किंवा हिंसाचाराला उत्तेजन देण्याच्या विरोधात आहेत. बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांबाबत महासचिवांच्या प्रतिक्रियेशी संबंधित प्रश्नांना ते उत्तर देत होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBSFसीमा सुरक्षा दल