शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरेक्षेसाठी भारताचं मोठं पाऊल; अमित शाह यांनी समिती स्थापन केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:24 IST

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात गोंधळ सुरू आहे. नोकरीतील आरक्षणावरुन जोरदार निदर्शने सुरू आहेत.

बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. पण, तरीही बांगलादेशातील गोंधळ थांबलेला नाही. आता बांगलादेशातील हिंदूंना लक्ष केले जात असल्याची माहिती समोर आली.  यावर आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठं पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घोषणा केली की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल.

कामाची बातमी! 'या' योजनेत गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकतात; योजनेबद्दल जाणून घ्या

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन माहिती दिली.  “बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील (IBB) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. ही समिती एडीजी, सीमा सुरक्षा दल, पूर्व कमांड यांच्या नेतृत्वाखाली असेल, असं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

बांगलादेशातील भारतीय आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही समिती  भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम करते. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्यात आली आहे, आणि अवामी लीगशी संबंधित किमान दोन हिंदू नेते पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून भारतात गेले. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील हल्ल्यांच्या घटनांदरम्यान, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते म्हणाले की, ते वांशिक कारणास्तव कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांना किंवा हिंसाचाराला उत्तेजन देण्याच्या विरोधात आहेत. बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्यांबाबत महासचिवांच्या प्रतिक्रियेशी संबंधित प्रश्नांना ते उत्तर देत होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBSFसीमा सुरक्षा दल