शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:45 IST

भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

बीजिंग : भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या या निर्णयाने भारत-चीनदरम्यान गेल्या काही वर्षांत तणावपूर्ण झालेल्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने २०२० मध्ये, मुख्यतः कोविड-१९ महासाथीमुळे, चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा स्थगित केला होता. मात्र, त्यानंतर लडाखमधील गलवान खोऱ्यातील सैन्यसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध कायम राहिले होते.भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदनात सांगितले की, चिनी नागरिक गुरुवारपासून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू येथील भारतीय व्हिसा केंद्रांमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जप्रक्रियेबाबत आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहितीही अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.सकारात्मक पाऊल - चीन भारताच्या या निर्णयाचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, ‘हे एक सकारात्मक पाऊल आहे. सीमा ओलांडून प्रवास सुलभ करणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर निर्णय हा निर्णय भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. जयशंकर यांनी १४-१५ जुलै रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनला भेट दिली होती.त्यांनी या दौऱ्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशीही संवाद साधला. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रादेखील सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक दिशा मिळत असल्याचे दिसते. 

टॅग्स :chinaचीनVisaव्हिसाIndiaभारत