शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:45 IST

भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

बीजिंग : भारताने या आठवड्यापासून चीनच्या नागरिकांना पुन्हा एकदा पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या या निर्णयाने भारत-चीनदरम्यान गेल्या काही वर्षांत तणावपूर्ण झालेल्या संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारत सरकारने २०२० मध्ये, मुख्यतः कोविड-१९ महासाथीमुळे, चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा स्थगित केला होता. मात्र, त्यानंतर लडाखमधील गलवान खोऱ्यातील सैन्यसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध कायम राहिले होते.भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदनात सांगितले की, चिनी नागरिक गुरुवारपासून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करू शकतात. बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू येथील भारतीय व्हिसा केंद्रांमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जप्रक्रियेबाबत आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहितीही अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.सकारात्मक पाऊल - चीन भारताच्या या निर्णयाचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकून यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, ‘हे एक सकारात्मक पाऊल आहे. सीमा ओलांडून प्रवास सुलभ करणे दोन्ही देशांच्या हिताचे आहे. एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर निर्णय हा निर्णय भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीन दौऱ्यानंतर घेण्यात आला आहे. जयशंकर यांनी १४-१५ जुलै रोजी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी चीनला भेट दिली होती.त्यांनी या दौऱ्यात चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशीही संवाद साधला. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रादेखील सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक दिशा मिळत असल्याचे दिसते. 

टॅग्स :chinaचीनVisaव्हिसाIndiaभारत