शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 05:10 IST

आयसीएमआर; ७८ जिल्ह्यांत साथीचा फैलाव

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे इटलीमध्ये जशी भयानक स्थिती निर्माण झाली ती वेळ केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे भारतावर ओढविली नाही, असे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिक ल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. भारतातील कोरोना साथीच्या स्थितीचा या संस्थेने आढावा घेतला आहे. त्यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे की, कोरोनाबाबत भारताला इटली होण्यापासून लॉकडाऊनने वाचविले आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्याआठ हजारांहून अधिक झाली आहे. त्यातील सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. देशातील फक्त ७८ जिल्ह्यांपुरता या साथीचा फैलाव मर्यादित राहिला आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याचे अतिरिक्त सचिव विकास स्वरूप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला नसता तर कोरोनाचा भारतात प्रचंड प्रमाणात संसर्ग होऊन इटलीत निर्माण झाली तशी परिस्थिती उद््भवली असती. मात्र केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.सोशल डिस्टन्सिंग आवश्यकआयसीएमआरने म्हटले आहे की, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंग नसेल तर एका कोरोना रुग्णामुळे महिनाभरात सुमारे ४०६ लोकांना या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे साथीचा झपाट्याने प्रसार होऊन अनेक जणांनी जीव गमावला असता. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगच्या बंधनामुळे आता एका कोरोना रुग्णाकडून फक्त दोन किंवा तीन लोकांनाच संसर्ग होण्याची शक्यता उरली आहे.देश एकूण रुग्ण मृत्यू बरे झाले उपचार सुरूइटली 1,52,271 19,468 32,534 1,00,269भारत 9,166 325 1,061 7,780

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीMedicalवैद्यकीयNarendra Modiनरेंद्र मोदी