शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:06 IST

इस्रायलने आता लेबनॉनमध्ये जमिनीवर लष्करी कारवाई सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हिजबुल्लाह मध्ये तणाव वाढला आहे. पेजर हल्ले, हवाई हल्ले करून इस्रायलने लेबनॉनमध्ये हाहाकार उडवून दिलेला असताना मंगळवारी रात्री लेबनॉनच्या हद्दीमध्ये सैन्य घुसविले आहे. इस्रायली सैन्याचे हजारो सैनिक रातोरात लेबनॉनमध्ये रणागाडे, रॉकेट लाँचर घेऊन घुसले आहेत. आयडीएफने मंगळवारी पहाटे याची माहिती जगाला दिली आहे. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.   

इस्त्रायलच्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडाली असून अनेक देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत आहेत. या युद्धामुळे भारतानेही आपल्या नागरिकांना लेबनॉनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य

लेबनॉनमध्ये ४००० हून अधिक नागरिक

मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनमध्ये ४००० हून अधिक भारतीय आहेत आणि केंद्र सरकारने सर्वांना लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. बेरूतमधील लेबनॉनमध्ये राहणारे भारतीय नागरिक बांधकाम क्षेत्र, कृषी फार्म इत्यादींमध्ये काम करतात.

भारतीय दुतावासाने याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, १९७५ ते १९९० च्या गृहयुद्धादरम्यान भारताने इतर देशांच्या दूतावासांप्रमाणे बेरूतमधील आपला दूतावास खुला ठेवला आणि कार्यरत राहिला. लेबनीज जनतेने, तसेच भारताचे अरब जगाशी असलेले पारंपारिकपणे मजबूत संबंध आणि पॅलेस्टाईनसाठी आमचे दृढ समर्थन याचे खूप कौतुक आहे, असंही ते म्हणाले. 

भारतीय दूतावासाने सर्व भारतीय नागरिकांना युद्धाच्या काळात या भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. सरकारने लेबनॉनमधील सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

"लेबनॉनमध्ये आधीपासूनच उपस्थित असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आवाहन केले आहे" असे दूतावासाने म्हटले आहे. जे लोक कोणत्याही कारणास्तव तेथे राहतात त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. काही अडचण आल्यास त्यांनी ईमेल आयडी: cons.beirut@mea.gov.in किंवा आपत्कालीन फोन नंबर +96176860128 द्वारे बेरूतमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली

ग्राउंड स्ट्राइक सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादाचा नायनाट कसा करणे आवश्यक आहे यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धNarendra Modiनरेंद्र मोदी