शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ड्रॅगनच्या ताब्यातील तिबेटवरून भारताचा उपग्रह गेला; चिनी सैन्यात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 20:17 IST

भारतीय उपग्रहानं मोलाची माहिती मिळवली; चीनकडून सैन्याची जमवाजमव सुरू

नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरू आहेत. एका बाजूला शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला सीमावर्ती भागात चीनची आगळीक सुरू आहे. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. विशेष म्हणजे भारतानं केवळ जमिनीवरूनच नव्हे, तर अवकाशातूनही चीनला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून आता अवकाशातून चिनी सैन्यावर नजर ठेवली जात आहे.चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून भारताना उपग्रह गेला. या उपग्रहानं चिनी सैन्याची बरीच माहिती गोळा केली. त्यानंतर चीनमध्ये एकच खळबळ उडाली. भारताच्या सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) तयार केलेला उपग्रह इमिसॅट इंटेलिजन्स इनपुट गोळा करण्याचं काम करतो. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम 'कौटिल्य' लावण्यात आली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची माहिती गोळा करता येते.अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या तिबेटच्या वरून भारताचा उपग्रह गेल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. हा भाग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात आहे. इस्रोनं तयार केलेल्या इमिसॅटमधील इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम शत्रूच्या जमिनीवरील ट्रान्समिशनचा वापर करून रेडिओ सिग्नलची माहिती मिळवतो. लडाखमधल्या पँगाँग त्सो येथील फिंगर ४ बद्दल भारत आणि चीनमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताचा उपग्रह तिबेटवरून गेला. त्यामुळे या भागात एकच खळबळ माजली.  

टॅग्स :chinaचीन