शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Indian Soldiers, Video: तिरंगा फडकावत तुडूंब भरलेल्या नदीतून जवानांनी केलं बचाव कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 11:15 IST

मुसळधार पाऊस अन् इतर संकटांवर मात करत अनेक ठिकाणी मदत कार्य सुरू

Indian Soldiers Rescue Operation Video: देशाच्या उत्तर भागात पावसाने काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर खूपच वाढताना दिसतोय. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड विध्वंस झाल्याचे चित्र आहे. ओडिशामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या चार राज्यांतील विविध अपघातांतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे तर शेकडो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये डोंगरांना तडे जाऊ लागले आहेत. त्याचा वैष्णोदेवी यात्रेवरही परिणाम झाला आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे, विविध सुरक्षा दलातील जवान आणि काही स्वयंसेवक पूरबाधित क्षेत्रात प्राण पणाला लावून बचाव कार्य पूर्णत्वास नेताना दिसत आहेत.

संततधार बरसणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील चक्की नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांसह सुमारे २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे तिरंगा हाती घेऊन बचाव कार्यदेखील सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक भाग जलमय झाले आहेत. संततधार पावसामुळे पौरी, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेहराडूनमधील मालदेवता परिसराला ओव्हरफ्लो सॉंग नदीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. डेहराडून ते जॉली ग्रँट विमानतळाला जोडणारा उड्डाणपूल पुरात वाहून गेला. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सरखेत गावात ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दर्‍हाळी नदीला तडा गेल्याने पीर पंजाल पर्वतरांगाच्या वरच्या भागात येथे अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. समुद्रातील खोल दाबामुळे ओडिशात मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे ओडिशातील अनेक किनारी भागांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे भिंती कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला. मयूरभंज, बालासोर आणि केओंझार जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर