शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Indian Soldiers, Video: तिरंगा फडकावत तुडूंब भरलेल्या नदीतून जवानांनी केलं बचाव कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 11:15 IST

मुसळधार पाऊस अन् इतर संकटांवर मात करत अनेक ठिकाणी मदत कार्य सुरू

Indian Soldiers Rescue Operation Video: देशाच्या उत्तर भागात पावसाने काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर खूपच वाढताना दिसतोय. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड विध्वंस झाल्याचे चित्र आहे. ओडिशामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या चार राज्यांतील विविध अपघातांतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे तर शेकडो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये डोंगरांना तडे जाऊ लागले आहेत. त्याचा वैष्णोदेवी यात्रेवरही परिणाम झाला आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे, विविध सुरक्षा दलातील जवान आणि काही स्वयंसेवक पूरबाधित क्षेत्रात प्राण पणाला लावून बचाव कार्य पूर्णत्वास नेताना दिसत आहेत.

संततधार बरसणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील चक्की नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांसह सुमारे २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे तिरंगा हाती घेऊन बचाव कार्यदेखील सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक भाग जलमय झाले आहेत. संततधार पावसामुळे पौरी, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेहराडूनमधील मालदेवता परिसराला ओव्हरफ्लो सॉंग नदीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. डेहराडून ते जॉली ग्रँट विमानतळाला जोडणारा उड्डाणपूल पुरात वाहून गेला. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सरखेत गावात ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दर्‍हाळी नदीला तडा गेल्याने पीर पंजाल पर्वतरांगाच्या वरच्या भागात येथे अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. समुद्रातील खोल दाबामुळे ओडिशात मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे ओडिशातील अनेक किनारी भागांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे भिंती कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला. मयूरभंज, बालासोर आणि केओंझार जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर