शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Indian Soldiers, Video: तिरंगा फडकावत तुडूंब भरलेल्या नदीतून जवानांनी केलं बचाव कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 11:15 IST

मुसळधार पाऊस अन् इतर संकटांवर मात करत अनेक ठिकाणी मदत कार्य सुरू

Indian Soldiers Rescue Operation Video: देशाच्या उत्तर भागात पावसाने काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर खूपच वाढताना दिसतोय. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड विध्वंस झाल्याचे चित्र आहे. ओडिशामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या चार राज्यांतील विविध अपघातांतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे तर शेकडो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये डोंगरांना तडे जाऊ लागले आहेत. त्याचा वैष्णोदेवी यात्रेवरही परिणाम झाला आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे, विविध सुरक्षा दलातील जवान आणि काही स्वयंसेवक पूरबाधित क्षेत्रात प्राण पणाला लावून बचाव कार्य पूर्णत्वास नेताना दिसत आहेत.

संततधार बरसणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील चक्की नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांसह सुमारे २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे तिरंगा हाती घेऊन बचाव कार्यदेखील सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक भाग जलमय झाले आहेत. संततधार पावसामुळे पौरी, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेहराडूनमधील मालदेवता परिसराला ओव्हरफ्लो सॉंग नदीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. डेहराडून ते जॉली ग्रँट विमानतळाला जोडणारा उड्डाणपूल पुरात वाहून गेला. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सरखेत गावात ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दर्‍हाळी नदीला तडा गेल्याने पीर पंजाल पर्वतरांगाच्या वरच्या भागात येथे अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. समुद्रातील खोल दाबामुळे ओडिशात मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे ओडिशातील अनेक किनारी भागांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे भिंती कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला. मयूरभंज, बालासोर आणि केओंझार जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर